शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेच्या लिकेजचा आधार

By admin | Updated: April 23, 2016 02:08 IST

जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंशावर स्थिरावत आहे. वाढत्या तापमाणामुळे पाण्याची पातळी खालावत आहे.

पाण्याचा असाही वापर : फुटलेल्या व्हॉल्व्हवरून समता नगरवासीय भागवितात तृष्णावर्धा : जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंशावर स्थिरावत आहे. वाढत्या तापमाणामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. यामुळे नळयोजनेला पाणी येत नाही. पाण्याच्या थेंबाथेंबाकरिता नागरिकांची परवड होत आहे. याच पाण्याचा थेंब अन् थेंब कामी यावा याकरिता पाणी टंचाईच्या झळा सोसत असलेल्या वरूड-म्हसाळा मार्गावरील समता नगर आणि गौतम नगर परिसरातील नागरिक पाणी पुरवठा योजनेच्या एयर व्हॉल्व्हच्या लिकेजमधून वाया जात असलेल्या पाण्यावर आपली गरज भागवत आहेत. या भागात नळ शासनाची नळ योजना असली तरी सध्या पाण्याच्या दूर्भिक्ष्यामुळे नळांना अपुरे पाणी येत आहे. आलेल्या पाण्यात नित्याची गरज भागत नाही. यामुळे या भागात पाण्याकरिता भटकंती सुरू आहे. पवनार येथून सेवाग्राम परिसरात गेलेल्या नळ योजनेच्या व्हॉल्व्हमधून पाणी लिकेज होत असल्याने नागरिक येथे पाणी भरण्याकरिता गर्दी करीत आहे. उन्हाचे चटके जाणवत असताना भर दुपारी सूर्य माथ्यावर असताना २ वाजताच्या सुमारास या भागातील महिला पुरूष पाण्याकरिता या लिकेज व्हॉल्व्हजवळ गर्दी करीत असतात. सायंकाळच्यावेळी तर येथे चांगलीच झुंबड उडत असल्याची माहिती आहे. व्हॉल्व्ह मधील पाणी थेट आपल्या बादलीत पडावे, याकरिता त्यांनी प्लास्टिकची थैली बांधून त्यातून पाणी घेण्याची शक्कल येथे लढविली आहे. यातून पाणी घेत या भागातील नागरिक त्यांची पाण्याची गरज भागवित आहेत. या भागात नळ योजनेद्वारे होणारा पाणी पुरवठा अत्यल्प असल्याने शासनाने येथे पाणी पुरवठा करण्याकरिता उपाययोजना आखण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी)