शहरं
Join us  
Trending Stories
1
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
2
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
3
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
4
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
5
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
6
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
7
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
8
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
9
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
11
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
12
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
13
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
14
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
15
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
16
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
17
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
18
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
19
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
20
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
Daily Top 2Weekly Top 5

देवळीत जलजागृती रॅलीतून प्रबोधन

By admin | Updated: March 18, 2016 02:21 IST

विद्यार्थ्यांची प्रबोधन रॅली काढण्यात आली. निम्न वर्धा कालवे विभागाच्यावतीने आयोजित रॅलीत जनता हायस्कूल, न.प. माध्यमिक शाळा,...

निम्न वर्धा कालवे विभागाचे आयोजन : साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
देवळी : विद्यार्थ्यांची प्रबोधन रॅली काढण्यात आली. निम्न वर्धा कालवे विभागाच्यावतीने आयोजित रॅलीत जनता हायस्कूल, न.प. माध्यमिक शाळा, यशवंत कन्या माध्यमिक शाळा, राजीव गांधी माध्यमिक शाळा, गुरुकुल विद्या निकेतन आदी शाळांतील साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. रॅलीचा शुभारंभ नगराध्यक्ष शोभा तडस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. शहरातील मुख्य मार्गाने फिरून रॅलीने प्रबोधन केले. पाणी वाचवा, जीवन वाचवा, बचत पाण्याची गरज काळाची आदी घोषणा देवून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले.
रॅलीचा समारोप श्यामसुंदर अग्रवाल धर्मशाळेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस व अतिथी म्हणून नगराध्यक्ष शोभा तडस, निम्न वर्धाचे कार्यकारी अभियंता शंकर मंडवा, उपविभागीय अधिकारी अशोक पावडे, सहाय्यक अभियंता गजानन घुगल, आर.आर. बोडेकर, अमोल चंदावार व सु.मो. इंगळे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी पाणी या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक निम्न वर्धाचे कार्यकारी अभियंता शंकर मंडवार यांनी केले. यशस्वीतेसाठी शाखा अभियंता प्रमोद पावडे, ज्ञानेश्वर सोळुंके, विश्वेश्वर कडू, सुनील रोहणकर, प्रशांत बन्सोड यांंच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक तसेच निम्न वर्धा कालवे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)

निकड लक्षात घेता अनेक योजना कार्यान्वित - तडस
भविष्यात पाण्याची निकड लक्षात घेता शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असल्याचे खा. तडस यांनी सांगितले. सन १९८० पासून रखडलेला लोअर वर्धा प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहे. विशेष बाब म्हणून केंद्र सरकारने या प्रकल्पाचा समावेश पंतप्रधान सिंचन योजनेत केला आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा या योजनेला पूनर्जिवीत करून शिवारातील तलावांचे खोलीकरण करण्यात येत आहे. यासाठी ३८ हजार कोटीच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक ग्रा.पं. ला ८० लाखाचा निधी देऊन गावातील नळयोजना कार्यान्वित करण्यात येत आहे. मनरेगा तसेच जलयुक्त शिवार योजनाचे माध्यमातून शेतातील विहिरींचे बांधकाम तसेच इतर कामे हाती घेण्यात आली आहे. या सर्व योजना गावापर्यंत नेवून नागरिकांना दिलासा दिला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.