शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

हिवरा (तांडा)तील कोरोना ‘ओपनिंग’ची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 05:00 IST

गतवर्षी राज्यात मार्च २०२० पासून कोरोनाचे थैमान सुरू झाले होते. मात्र, वर्धा जिल्हा यापासून दूर होता. प्रशासनानेही विषाणूला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या होत्या; पण अखेर १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एका महिलेच्या मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. अख्ख्या गावात कंटेन्मेंट झोन तयार करून गाव दोन दिवसांसाठी सील करण्यात आले होते.

ठळक मुद्देवर्षभरात ४१ हजारावर रुग्ण : १० मे २०२० रोजी मृत्यूपश्चात आढळली होती पहिली कोरोनाबाधित महिला

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोनामुक्त असलेल्या वर्धा जिल्ह्यात १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील महिलेचा मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला अन् आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली होती. रुग्ण निघाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच रस्त्यांवरही शुकशुकाट होता. आता वर्षभरात तब्बल ४१  हजारांवर रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ३३ हजार ८३६ जणांनी कोविडवर मात केली, तर १०१६ जणांचा कोरोनाने बळी घेतला. गतवर्षी राज्यात मार्च २०२० पासून कोरोनाचे थैमान सुरू झाले होते. मात्र, वर्धा जिल्हा यापासून दूर होता. प्रशासनानेही विषाणूला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या होत्या; पण अखेर १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एका महिलेच्या मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. अख्ख्या गावात कंटेन्मेंट झोन तयार करून गाव दोन दिवसांसाठी सील करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांसाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. मृत महिलेचा पती दारूविक्रीचा व्यवसाय करीत असल्याने ती इतर गावांतही दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने तिच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले होते. एकीकडे वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असताना दुसरीकडे सावंगी येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेला वाशिम जिल्ह्यातील ६४ वर्षीय रुग्णही पॉझिटिव्ह आढळून आल्याचे समजल्याने आणखी भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले होते.  त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. विशेष म्हणजे वर्षभरात आढळलेल्या रुग्णांच्या बरोबरीने एकट्या मे महिन्यात रुग्ण आढळून आले. पहिल्या लाटेतील मे महिन्यापेक्षा दुसऱ्या लाटेतील मे महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत, तसेच मृत्यूदरातही कमालीची वाढ झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.  दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील एक हजारांवर गावांना कोरोनाने विळखा घातला आहे. मृत्यूचे प्रमाणही अलीकडे वाढत चालले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०१६ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ३३ हजार ८३६ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.

‘ती’च्या अंत्ययात्रेला उसळली होती गर्दी अन् उडाली झोप महिलेच्या मृत्यूपश्चात तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला होता. अशातच तिच्या अंत्यविधीला चांगलीच गर्दी उसळली होती. त्यामुळे अंत्यविधीला उपस्थित असलेल्यांचा शोध घेऊन तपासणी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते. प्रशासनाकडून हिवरा गावापासून तीन कि.मी. अंतरावरील हर्रासी, राजनी, जामखुटा, पाचोड, बेलारा तांडा या गावांचा परिसरही सील करण्यात आला होता, तसेच अंत्यविधीला उपस्थित असलेल्यांना होम, संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस