शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
2
दिल्लीतील दोन रुग्णालये आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू
3
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
4
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
5
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
6
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
7
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
8
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
9
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
10
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
11
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
12
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
13
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
14
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
15
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
16
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
17
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
18
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
19
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
20
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 

हिवरा (तांडा)तील कोरोना ‘ओपनिंग’ची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 5:00 AM

गतवर्षी राज्यात मार्च २०२० पासून कोरोनाचे थैमान सुरू झाले होते. मात्र, वर्धा जिल्हा यापासून दूर होता. प्रशासनानेही विषाणूला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या होत्या; पण अखेर १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एका महिलेच्या मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. अख्ख्या गावात कंटेन्मेंट झोन तयार करून गाव दोन दिवसांसाठी सील करण्यात आले होते.

ठळक मुद्देवर्षभरात ४१ हजारावर रुग्ण : १० मे २०२० रोजी मृत्यूपश्चात आढळली होती पहिली कोरोनाबाधित महिला

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोनामुक्त असलेल्या वर्धा जिल्ह्यात १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील महिलेचा मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला अन् आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली होती. रुग्ण निघाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच रस्त्यांवरही शुकशुकाट होता. आता वर्षभरात तब्बल ४१  हजारांवर रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ३३ हजार ८३६ जणांनी कोविडवर मात केली, तर १०१६ जणांचा कोरोनाने बळी घेतला. गतवर्षी राज्यात मार्च २०२० पासून कोरोनाचे थैमान सुरू झाले होते. मात्र, वर्धा जिल्हा यापासून दूर होता. प्रशासनानेही विषाणूला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या होत्या; पण अखेर १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एका महिलेच्या मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. अख्ख्या गावात कंटेन्मेंट झोन तयार करून गाव दोन दिवसांसाठी सील करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांसाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. मृत महिलेचा पती दारूविक्रीचा व्यवसाय करीत असल्याने ती इतर गावांतही दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने तिच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले होते. एकीकडे वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असताना दुसरीकडे सावंगी येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेला वाशिम जिल्ह्यातील ६४ वर्षीय रुग्णही पॉझिटिव्ह आढळून आल्याचे समजल्याने आणखी भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले होते.  त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. विशेष म्हणजे वर्षभरात आढळलेल्या रुग्णांच्या बरोबरीने एकट्या मे महिन्यात रुग्ण आढळून आले. पहिल्या लाटेतील मे महिन्यापेक्षा दुसऱ्या लाटेतील मे महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत, तसेच मृत्यूदरातही कमालीची वाढ झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.  दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील एक हजारांवर गावांना कोरोनाने विळखा घातला आहे. मृत्यूचे प्रमाणही अलीकडे वाढत चालले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०१६ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ३३ हजार ८३६ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.

‘ती’च्या अंत्ययात्रेला उसळली होती गर्दी अन् उडाली झोप महिलेच्या मृत्यूपश्चात तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला होता. अशातच तिच्या अंत्यविधीला चांगलीच गर्दी उसळली होती. त्यामुळे अंत्यविधीला उपस्थित असलेल्यांचा शोध घेऊन तपासणी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते. प्रशासनाकडून हिवरा गावापासून तीन कि.मी. अंतरावरील हर्रासी, राजनी, जामखुटा, पाचोड, बेलारा तांडा या गावांचा परिसरही सील करण्यात आला होता, तसेच अंत्यविधीला उपस्थित असलेल्यांना होम, संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस