शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

विलगीकरणासाठी शहरातील अठरा शाळा अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 5:00 AM

कोविड-१९ साथरोग प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत बाहेर राज्यातील, जिल्ह्यातील लोकांना विलगीकरण करुन सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले होते. आता त्यांना त्यांच्या मुळ गावी पोहोचविण्याचे काम सुरु आहे.आता आपल्या जिल्ह्यातील व्यक्ती बाहेर जिल्ह्यात किंवा राज्यात अडकून पडल्याने ते आता गावाकडे येत आहे.

ठळक मुद्देएसडीओेंचा आदेश : शाळा व्यवस्थापनाला करावी लागणार व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बाहेर जिल्ह्यातून, राज्यातून तसेच कोरोनग्रस्त भागातून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत साडेआठ हजारावर व्यक्ती शहरात आले आहे. त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे प्रमाण आणखी वाढणार असून ज्यांना घरी विलगीकरणात राहणे शक्य होणार नाही, अशांकरिता प्रशासनाकडून शहरातील १८ शाळा, महाविद्यालये अधिग्रहित केले असून शाळा व्यवस्थापनाने तेथे व्यवस्था करुन देण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिले आहे.कोविड-१९ साथरोग प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत बाहेर राज्यातील, जिल्ह्यातील लोकांना विलगीकरण करुन सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले होते. आता त्यांना त्यांच्या मुळ गावी पोहोचविण्याचे काम सुरु आहे.आता आपल्या जिल्ह्यातील व्यक्ती बाहेर जिल्ह्यात किंवा राज्यात अडकून पडल्याने ते आता गावाकडे येत आहे. यापुढेही ते येणार असल्याने गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या मार्फत माहिती प्राप्त करुन त्यांना १४ दिवसाकरिता गृह विलगीकरणामध्ये ठेवले जात आहे. पण, काहींची घरे लहान असल्यामुळे तेथे आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असतो किंवा घरातील इतर व्यक्तीची अडचण होते. त्यामुळे अशा व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करणे सर्वांच्याच दृष्टीने सोयीचे असल्याने गावातील, शहरातील शाळा, महाविद्यालये अधिग्रहित करण्याचे आदेश देण्यात आले आहे.वर्ग खोल्यांमधील फर्निचर इतरत्र ठेवून आवश्यकतेनुसार वर्ग खोल्या खाली करुन द्याव्या तसेच वीज, पंखे, पाणी, स्वच्छता व सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्याच्या सूचना अधिग्रहित केलेल्या शाळा, महाविद्यालयाच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना दिल्या आहे.नागठाणा येथील अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालय आधीच अधिग्रहित करण्यात आले आहे. आता आणखी १७ असे एकूण १८ शाळा व महाविद्यालये अधिग्रहित केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या