शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

६९ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: October 1, 2014 23:26 IST

नामांकन परत घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी १६ जणांनी आपली उमेदवारी परत घेतल्यामुळे निवडणूक रिंगणात ६९ उमेदवार एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. आर्वी मतदार संघात १५, देवळीत १९,

रणसंग्रामाला सुरुवात : २९ अपक्षांसह सर्वच राजकीय पक्ष मैदानातवर्धा : नामांकन परत घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी १६ जणांनी आपली उमेदवारी परत घेतल्यामुळे निवडणूक रिंगणात ६९ उमेदवार एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. आर्वी मतदार संघात १५, देवळीत १९, हिंगणघाटात १४ आणि वर्धा मतदार संघात २१ उमेदवार आहेत. यामध्ये चारही मतदार संघात २९ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. नामांकन परत घेण्याच्या आदल्यादिवशी देवळीतून मनसेचा उमेदवार बाद झाला, तर आर्वीतून माघार घेतल्यामुळे या दोन्ही मतदार संघातून मनसेचे आव्हान संपुष्टात आले आहे. चारही मतदार संघात प्रचार तोफा आता मैदानात सज्ज झाल्या आहे.आर्वी, हिंगणघाट, देवळी आणि वर्धा या चारही मतदार संघात किती उमेदवार रिंगणात राहतील, याची उत्सुकता संपली. उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली असून देवळी व आर्वीत मनसे वगळता जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार रिंंगणात आहे. वर्धेतील सर्वाधिक १४ राजकीय पक्षांचे उमेदवार एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. सात अपक्षही रिंगणात आहे. अपक्षांना चिन्हांचेही वाटप करण्यात आले. भाजपाचे दोन बंडखोर रिंगणात असून एकाने माघार घेतली आहे. काँग्रेसच्या दोघांनी आपले नामांकन परत घेतल्यामुळे बंडाळीचा धोका टळला आहे. गुरुवारपासून खऱ्या प्रचाराला सुरुवात होईल. जिल्ह्यात सर्वाधिक २१ उमेदवार वर्धा विधानसभा क्षेत्रात आहेत. अर्ज परत घेण्याच्या अंतिम तारखेला सहा जणांनी आपले अर्ज परत घेतले आहे. हिंगणघाट मतदार संघात पाच अपक्षांसह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदार संघातून एकानेही माघार घेतली नाही. सात जणांनी आपले नामांकन परत घेतल्याने देवळी विधानसभा क्षेत्रात नऊ अपक्षांसह १९ उमेदवार रिंगणात आहेत. आर्वी विधानसभा मतदार क्षेत्रातून तिघांनी माघार घेतली. आता १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मनसेने मतदार संघातून माघार घेतली आहे.(प्रतिनिधी)