शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

६८ टक्के घरे आहेत शौचालयाविना

By admin | Updated: November 9, 2014 23:16 IST

जिल्ह्यातील ६८.४१ टक्के घरात शौचालय नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उघड्यावर शौचालयात जाण्याची वेळ कुटुंबीयांवर येत आहे.

वायगाव (निपाणी) : जिल्ह्यातील ६८.४१ टक्के घरात शौचालय नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उघड्यावर शौचालयात जाण्याची वेळ कुटुंबीयांवर येत आहे. अशा परिस्थितीत संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करतात. ही स्थिती प्रगतीशील महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे.जिल्ह्यातील आठ तालुक्यातील शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट ९५ हजार आठ हजार एवढे आहे. मात्र त्यात २०१३-१४ मध्ये जिल्ह्यात केवळ १४ हजार ६५१ शौचालय बांधण्यात आले आणि सन २०१४-१५ मध्ये आतापर्यंत १५ हजार ३६३ शौचालय बांधण्यात आले. जिल्ह्यात ६५ हजार ०७ घरं शौचालयाविनाच आहे. यात अजूनही जिल्ह्यात ६८.४१ टक्के घरात शौचालय नसल्याची धक्कादायक माहिती आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यात ५१७ ग्रामपंचायती आहेत. त्यात २ लाख १० हजार २६३ घरे आहेत. यापैकी जिल्हा परिषद वर्धा यांना ९५ हजार ८ घरात शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट्य होते. असे असताना केवळ ३० हजार १४ घरात शौचालय बांधण्यात आले. कारंजा तालुक्यात संख्यात्मक दृष्ट्या सर्वाधिक शौचालय आहे. यात उद्दिष्ट आठ हजार ३६१ असून त्यात पाच हजार ८७७ शौचालयाची निर्मिती केली. त्यात फक्त दोन हजार ४८४ बाकी आहे. सर्वात कमी शौचालय हे आष्टी तालुक्यात असून येथे सात हजार १०४ शौचालयाचे उदिष्ट असून १ हजार ७३० शौचालयांची निर्मिती झाली आहे. यात पाच हजार ३७४ घरं शौचालय विना आहेत. वर्धा तालुक्यात ठरविलेले उद्दिष्टे १५ हजार ९७८ असून सन १३-१४ मध्ये १ हजार ७३६ तर सन १४-१५ मध्ये २ हजार ५७१ म्हणजे चार हजार ३०७ शौचालय निर्मिती केली. तालुक्यातील ११ हजार ६७१ घरे शौचालयाविनाच आहे. समुद्रपूर तालुक्यामध्ये १३ हजार ८८७ उद्दिष्ट असून तीन हजार ७४९ शौचालय निर्मिती केली. येथील १० हजार १३८ घरे अजूनही शौचालयाविनाच आहे. आर्वी तालुक्यातील १२ हजार ३२७ उद्दीष्ट असून २ हजार ५५६ शौचालय निर्मिती केली. त्यात ९ हजार ७७१ घरे शौचालयविनाच आहे. देवळी तालुक्यातील १२ हजार १७ उद्दिष्ट असून तीन हजार ५२४ शौचालयानिर्मिती केली असून आठ हजार ४९३ घरे शौचालय विनाच आहे. हिंगणघाट तालुक्यात १३ हजार ९५७ शौचालयाचे उद्दीष्ट असून चार हजार ६६१ शौचालयाची निर्मिती करण्यात आली असून ९ हजार १९६ घरे शौचालयाविनाच आहे. सेलू तालुक्यात ११ हजार ४८७ शौचालय बनविण्याचे उद्दिष्ट असताना केवळ तीन हजार ६०७ शौचालय बांधण्यात आले आहे. त्यात ७ हजार ८८० घरे अजूनही शौचालयाविनाच आहे. (वार्ताहर)