शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

५०० एकरातील पिके पुराच्या पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

वर्धा नदीकाठावरील रोहणा, दिघी, सायखेडा व वडगांव येथील शेतकऱ्यांची अंदाजे ५०० एकरातील पिके पाण्याखाली आल्याने पिके धोक्यात आली आहे. निम्न वर्धा प्रकल्पातील ३१ दरवाजे ३० से.मी.ने उघडल्यामुळे नदीत ८५७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला. रात्रीच्या सुमारास पाऊस सुरूच असल्याने धरणाचे सोडलेले पाणी व पावसाचे पाणी यामुळे वर्धा नदीतील पुराच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे मोठे नुकसान : निम्न वर्र्धा प्रकल्पाची ३१ दारे उघडली, सतर्कतेचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : सततच्या पावसाने निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दारे ३० सें.मी.ने उघडल्याने वर्धा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने तसेच पावसाच्या कोसळधाराने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठालगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरुन सुमारे ५०० एकरातील पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.वर्धा नदीकाठावरील रोहणा, दिघी, सायखेडा व वडगांव येथील शेतकऱ्यांची अंदाजे ५०० एकरातील पिके पाण्याखाली आल्याने पिके धोक्यात आली आहे. निम्न वर्धा प्रकल्पातील ३१ दरवाजे ३० से.मी.ने उघडल्यामुळे नदीत ८५७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला. रात्रीच्या सुमारास पाऊस सुरूच असल्याने धरणाचे सोडलेले पाणी व पावसाचे पाणी यामुळे वर्धा नदीतील पुराच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. परिणामी, नदीला मिळणाऱ्या नदी,नाल्यांचे पाणी वर्धा नदीपात्रात समावू शकले नसल्याने नदीकाठावर असलेले जमीन पाण्याखाली गेली आहे. रोहणा, सायखेडा, दिघी, वडगाव येथील शेतकऱ्यांनी शेतात कापूस, तुर, सोयाबीन ही पीके घेतली आहे. शेतकºयांनी मोठा खर्च करुन पिके घेतली आहे.जमीनीत बऱ्यापैकी ओलावा असल्यामुळे बहुतेक शेतकºयांनी आपल्या पिकांना नुकताच रासायनिक खतांचा डोज दिला व कीड नियंत्रणासाठी महागड्या औषधींची फवारणी केली होती.मात्र, आता पीक धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. शासनाने पिकांचे सर्वेक्षण करुन आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

अप्पर वर्धा प्रकल्पाचे दार दोन सें.मी.ने उघडल्याने वर्धा नदीला आलेल्या पुराचे पाणी देऊरवाडा येथील पुलावरून वाहत असल्याने लोअर वर्धा प्रकल्पाचे दारं जास्त वर घेणे आवश्यक होते. म्हणून वरिष्ठांच्या आदेशान्वये सध्या ३१ दरवाजे १३० से.मी. उघडल्याने वर्धा नदीत ३४६६ क्युसेक प्रति सकेंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.- देवानंद कापडे, शाखा अभियंता निम्न वर्धा प्रकल्प, धनोडी (बहादुरपूर)महामार्गावरील पुलाचे पाणी थेट शेतातसाहूर : आधीच विविध संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यावर आता नवीनच संकट ओढावले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पूल शेतजमिनीच्या सात फूट उंच केल्याने पुलावरील पाणी थेट शेतकऱ्याच्या शेतात गेले असून पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकºयावर आत्महत्येची वेळ आली आहे. मात्र, कंत्राटदाराचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. साहूर नजीकच्या द्रुगवाडा येथील शेतकरी रामदास कोंढेकर यांचे राष्ट्रीय महामार्गालगत शेत आहे. महामार्गावर असलेल्या नाल्यावरील पूल हा शेतजमिनीच्या पातळीपेक्षा सात फूट खोल असून शेकडो एकरातील नालीचे पाणी पुलाच्या खड्ड्यात साचत असल्याने शेताला मोठाले भगदाड पडले असून शेतातील पिके धोक्यात आली आहे. रस्ता काठचे पाणी शेतात पाझरुन दोन एक शेत जलमय झाले आहे. हेच पाणी विहिरीत पाझरुन कृषीपंपासह विहिरी खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत आमदार दादाराव केचे यांनी आर.आर. कन्स्ट्रक्शनच्या कंत्राटदाराला स्वत: शेतात आणून दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, अद्यापही कंत्राटदाराने कुठलीही दुरुस्ती केलेली नाही. कंत्राटदाराने पुलाचे काम करताना शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष दिले नसल्याने साहूर येथील शेतकरी इंदिराबाई, दादाराव तळहांडे, शेख वशिक अली यांच्यासह अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.याप्रकाराबाबत आष्टी येथील तहसीलदारांनी संबंधित कंत्राटदाराला नाली व पुलाची दुरुस्ती करुन पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी, अन्यथा आमच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही.शेतकरी-रामदास कोंढेकार .द्रुगवाडा.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर