शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 16:27 IST

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीक उत्तर प्रदेशचे निकाल कमालीचे धक्कादायक लागले होते. तसेच त्यामध्ये उत्तर प्रदेशात भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पक्षाच्या झालेल्या या दारुण पराभवाबाबतचं चिंतन आणि मंथन भाजपामध्ये (BJP) जोरदार सुरू आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीक उत्तर प्रदेशचे निकाल कमालीचे धक्कादायक लागले होते. तसेच त्यामध्ये उत्तर प्रदेशात भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. मागच्या दोन निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात निर्विवाद विजय मिळवणाऱ्या भाजपाला अवघ्या ३३ जागांवर समाधान मानावं लागलं. आता पक्षाच्या झालेल्या या दारुण पराभवाबाबतचं चिंतन आणि मंथन भाजपामध्ये जोरदार सुरू आहे. त्यासाठी शुक्रवारी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक लखनौमध्ये झाली. या बैठकीत पक्षाचा पराभव झालेल्या जागांचा आढावा घेण्यात आला. तसेच या बैठकीत विशेष टीमने तयार केलेला आढावा अहवालही सादर केला. त्यात पराभवाबाबतची काही धक्कादायक कारणं नमूद करण्यात आली आहेत.  

या अहवालामध्ये नेत्यांकडून जनता आणि कार्यकर्त्यांना दिली गेलेली वागणूक आणि पक्षविरोधी कारवायांचा उल्लेख करण्यात आला आगे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा आढावा घेत असलेल्या भाजपाच्या विशेष टीमने हा विस्तृत अहवाल राज्याच्या नेतृत्वाकडे सुपुर्द केला आहे. या अहवालात पराभवाची अनेक कारणं नमूद करण्यात आली आहेत.

विविध विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या निष्क्रियतेमुळे पक्षाचं नुकसान झालं. एवढंच नाही, तक अनेक आमदार हे आपल्या लोकसभा मतदारसंघातील खासदारांच्या विरोधात होते. तसेच अशा मतदारसंघांमध्ये पक्षविरोधी काम केलं गेलं, असे या अहवालात म्हटलं आहे. त्याबरोबरच संविधान बदललं जाईल, असे दावे केले गेल्याने मागासवर्गीय मतदार दुरावले. तसेच ओबीसी मतदारही दुरावले. या सर्वाचा परिणाम म्हणून भाजपाचा दारुण पराभव झाला, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

तसेच कार्यकर्त्यांच्या पदाधिकारी आणि नेत्यांबाबत असलेल्या नाराजीमुळे भाजपाच्या बाजूने मतदान कमी झालं. तसेच खूप प्रयत्न करूनही ओबीसी मतदारांमधील फूट टाळता आली नाही. तसेच संविधानाच्या मुद्द्यावरून मागासवर्गीय मतं दुरावली. भाजपाच्या विशेष समितीने तीन टप्प्यांमध्ये हा अहवाल तयार केला आहे. 

लोकसभा निवडणुकीत पक्षाचं भक्कम संघटन, राम मंदिरामुळे आलेली लाट यामुळे उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या ८० पैकी अधिकाधिक जागा जिंकण्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत होता. मात्र भाजपाला केवळ ३३ जागांवर समाधान मानावं लागलं. तर भाजपाच्या मित्रपक्षांना ३ जागा मिळाल्या. समाजवादी पक्षाने ३७ आणि काँग्रेसने ६ जागांवर विज मिळवला. तर इतरांच्या खात्यात एक जागा गेली. एकेकाळी उत्तर प्रदेशातील मोठी शक्ती असलेल्या बसपाला एकही जागा मिळाली नाही.  

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ