शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बोअर  होतंय ? -मग  फोन  करा, call  now !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 5:30 PM

आपल्याला एरव्ही ज्यांच्याशी बोलावंसं वाटतं, पण आपल्याला त्यांना फोन करायला वेळ होत नाही अशा लोकांना फोन करायचे.

ठळक मुद्देएक फोन करा आणि भरपूर गप्पा मारा.

- गौरी पटवर्धन

घरात बसून राहायला बोअर होतं यार. शिवाय ‘हे करू नको’,  ‘ते करू नको’,  ‘फार वेळ गेम्स खेळू नको’,   ‘सारखा टीव्ही बघू नको’, हे सगळे नियम असतातच मागे. अशात जर आई-बाबांकडे आपण फोन मागितला तर काय होईल? आधी ते नाही म्हणतील. आपण परत मागितला तर? रागावतील!

पण जर आपण त्यांना सांगितलं की आपल्याला तो मोबाइल का पाहिजे आहे तर कदाचित ते फोन देतील आपल्याला. तो फोन मिळाल्यावर आपण काय करायचं माहिती आहे का? तर आपल्याला एरव्ही ज्यांच्याशी बोलावंसं वाटतं, पण आपल्याला त्यांना फोन करायला वेळ होत नाही अशा लोकांना फोन करायचे.

असे लोक कोण असू शकतात? तर आपले नातेवाईक असू शकतात. आजी, आजोबा, काका, मामा, मावशी, आत्या, दादा, वहिनी, ताई, तेही त्यांच्या त्यांच्या घरात अडकून पडलेले असतात. त्यांच्याशी निवांत फोनवर गप्पा मारण्यासाठी ही चांगली संधी असू शकते.

किंवा असे अनेक लोक असतात ज्यांच्याबद्दल आपल्याला उत्सुकता असते. ते लोक कुठे राहातात? कसे जगतात? त्यांच्या घरी कोण कोण असतं? हे आपल्याला अजिबात माहिती नसतं;  पण ते लोक तर अगदी जवळून आपल्या ओळखीचे असतात. म्हणजे कोण? तर आपल्या घरी कामाला येणा:या मावशी, सोसायटीतील कचरा घेऊन जाणारे काका, नेहमीचे भाजीवाले काका, घरी दूध आणून देणारा दादा असे अनेक लोक आपली खूप कामं करत असतात. त्यांनाही आत्ता घरी बसून राहावं लागत असेल. तुम्ही त्यांना फोन करून त्यांची चौकशी केलीत तर त्यांनाही बरं वाटेल. कारण शेवटी आनंदात सेलिब्रेट करताना सगळेच एकमेकांबरोबर असतात; पण अडचणीच्या वेळी जे एकमेकांची काळजी घेतात तेच आपले खरे जवळचे लोक असतात..हो ना?