लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
ठाणे शहरातील श्रीरंग विद्यालयाच्या मतदान केंद्रामध्ये तासन् तास उभे राहूनही प्रत्यक्ष मतदानासाठी क्रमांक येत नसल्यामुळे अनेक मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
नाशिक शहरातही मोठ्या प्रमाणावर मतदारांचा उत्साह पहावयास मिळत आहे. सर्वच मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत पहावयास मिळाली. ...
लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी प्रारंभीच श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, नेवासे तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रे बंद पडल्याचे प्रकार घडले. निवडणूक यंत्रणेची मोठी धावपळ झाली. ...
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी सोमवारी सकाळी साडे सात वाजता जे. बी. खोत शाळा, साईबाबा नगर, बोरिवली पश्चिम येथे सहकुटुंब उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. ...
शिरूर मतदारसंघातील काही केंद्रावर दिव्यांग मतदारांना घेऊन जाण्यासाठी प्रशासनाकडून ऑटो रिक्षांची सोय करण्यात आली आहे. या रिक्षांमुळे दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यास मदत होत आहे. ...