वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
Congress Harshwardhan Sapkal News: आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढाव्यात, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे आणि त्याचे स्वागत केले पाहिजे, असे नेत्यांनी म्हटले आहे. ...
Nagpur : आयुष्याच्या सर्वात कठीण क्षणीही हार न मानणाऱ्या प्रगती जगतापने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जातीमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळवत इतिहास रचला आहे. ...
‘अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दाेषी असताे’ या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मरून मी हे सत्य सर्वांसमाेर मांडत आहे - प्रेम बिऱ्हाडे ...
हा आक्रोश मोर्चा शेतकरी, वंचितांच्या भावना शासनाकडे व्यक्त करण्यासाठी असून मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी केली मोर्चेकऱ्यांनी यावेळी केली. ...