देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Municipal Election 2026: उद्धवसेना, मनसे, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी आपापल्या पक्षाच्या पराभूतांची साधी विचारपूस केली नाही, असे म्हटले जात आहे. ...
ZP election 2026: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अलिकीडल काळातील वक्तव्यावरून तसे संकेत मिळत आहेत. ...