देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Chandrapur Municipal Corporation Election: चंद्रपूर महानगरपालिकेमधील वादावर अखेरीस पडदा पडला असून, तिथे महापौर कोण होणार याबाबतचा निर्णय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार असल्याचे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ...
1984 anti-Sikh riots case: १९८४ च्या शिखविरोधी दंगलीतील जनकपुरी हिंसाचार प्रकरणात दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना निर्दोष मुक्त केले आहे. वाचा सविस्तर वृत्त. ...