देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी गांधी यांना गैरमार्गाने अटक करून लोकशाहीचा गळा दाबल्याचा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. ...
चारदा खासदार राहिलेले आणि सलग १५ वर्षे निवडून येणारे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा काँग्रेसचे धानोरकर यांनी लोकसभा निवडणुकीत केलेला पराभव म्हणजे, काँग्रेसला मिळालेला जनाधार समजला जात आहे. ...