शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वालधुनी नदी स्वच्छतेसाठी स्थानिक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:37 AM

नदी परिसराची केली पाहणी; नियम डावलून बांधकामे झाल्याने पुराचे पाणी शिरले होते घरांत

कल्याण : वालधुनी नदीचे केडीएमसीच्या चुकीमुळे नाल्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे योगीधाम आणि आसपासच्या परिसरात थोड्या पावसानेही पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. केडीएमसी प्रशासन नदी स्वच्छ करण्याचे काम हाती घेत नसेल तर आम्ही स्वत: पुढाकार घेऊन नदी स्वच्छता करू, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. भाजप कल्याण शहर महिला अध्यक्ष पुष्पा रत्नपारखी यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी रविवारी नदी परिसराची पाहणी केली.पश्चिमेतील गौरीपाडा येथील घोलपनगर प्रवेशद्वार ते गुरुआत्मन परिसरातील योगीधाम, भवानीनगर, कैलास गार्डन, वास्तुसिद्धी, त्रिमूर्ती कॉलनी, मिलिंदनगर या भागात जवळपास चाळीस हजार लोकसंख्येची वस्ती आहे. हा संपूर्ण परिसर वालधुनी नदीच्या सखल पात्राला लागून आहे. या सखल भागात काही विकासकांनी आपली बांधकामे करताना मोठ्या प्रमाणात बेकायदा भरणी आणि नियमांचे पालन न केल्याने पावसाळयात पुराचे पाणी इमारती तसेच चाळींमध्ये शिरल्याने या परिसरातील रहिवाशांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.या परिसरात साफसफाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. केडीएमसीने या परिसरातील कर माफ करावा, जेणेकरून या पैशाने नदीची आम्हीच सफाई करू,असे स्थानिकांचे म्हणणे आहे. वालधुनी नदीची रविवारी रत्नपारखी यांच्यासह नदी बिरादरीचे कार्यकर्ते शशिकांत दायमा, अनुष्का शर्मा, सुनील उत्तेकर, मनसेचे कार्यकर्ते गणेश नाईक, नूर बिरवाडकर, भक्ती साळवी, तृप्ती राणे, शोभा थदानी, जयश्री सावंत आदींनी पाहणी केली.नदीचा उल्लेख केला नालाकेडीएमसीच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्टसिटी’ प्रकल्पाचे कामही याच भागात होत आहे. भरणीमुळे या भागातील नदीच्या आणि पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. या भागातील विविध बांधकाम तसेच प्रकल्पांना केडीएमसीने मंजुरी देताना वालधुनी नदीचा उल्लेख नाला असा केला असल्याचा आरोप भाजपच्या कल्याण शहर महिला अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी यांनी केला.