शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

उल्हासनगरात थरार, कोयता,चाकूने भररस्त्यात एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 4:37 PM

उल्हासनगर कॅम्प नं -३ खन्ना कंपाऊंड येथे राहणाऱ्या वेदप्रकाश उर्फ गोलू याचा राकेश नावाच्या मुला सोबत शुक्रवारी रात्री ११ वाजता वाद झाला.

उल्हासनगर : विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन रस्त्यावर ६ जणाचा टोळक्याने क्षुल्लक कारणावरून शुक्रवारी रात्री ११ वाजता वेदप्रकाश उर्फ गोलू याचा कोयता, चाकू आदी शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी ६ जणांना अटक केली.उल्हासनगर कॅम्प नं -३ खन्ना कंपाऊंड येथे राहणाऱ्या वेदप्रकाश उर्फ गोलू याचा राकेश नावाच्या मुला सोबत शुक्रवारी रात्री ११ वाजता वाद झाला. या वादाचा राग येवून विनोद मगरे, समीर शेख, दीपक शिंदे, रवी खांडेकर, रवी वाघ व दीपक सुरडकर आदींनी कोयता, चाकू असे धारदार शस्त्र घेऊन वेदप्रकाश याच्या मागे धावले. विठ्ठलवाडी रेल्वे रस्त्यावर गाठून वेदप्रकाश यांच्यावर शस्त्रांनी त्यांनी वार केले.रक्ताच्या थारोळ्यात निचपत पडलेल्या वेदप्रकाश याला नातेवाईक व पोलिसांनी मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले. मात्र तब्येत गंभीर असल्याने, शहरातील मिरा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने अखेर ठाणे येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आय व्ही कोकरे यांनी दिली आहे. मध्यवर्ती पोलिसांनी तपासाची चक्र जलद फिरवीत ६ जणांना अटक केली, तसेच शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिल्याची माहिती तपास अधिकारी कोकरे यांनी दिली. या प्रकाराने खन्ना कंपाऊंड परिसरात तणावाचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात शहरातील गुन्ह्याच्या व चोरीच्या प्रमाणात वाढ आल्याने पोलिसाची डोकेदुखी वाढली आहे.