शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

एकाच परमिटवर दोन रिक्षा

By admin | Updated: November 11, 2016 02:58 IST

जुनी रिक्षा विकून नवीन रिक्षा घेतल्याचे भासवायचे. मात्र प्रत्यक्षात दोन्ही रिक्षा एकाच परमीटवर चालवायच्या, असा प्रकार कल्याण डोंबिवलीत बोकाळला आहे

आकाश गायकवाड, डोंबिवलीजुनी रिक्षा विकून नवीन रिक्षा घेतल्याचे भासवायचे. मात्र प्रत्यक्षात दोन्ही रिक्षा एकाच परमीटवर चालवायच्या, असा प्रकार कल्याण डोंबिवलीत बोकाळला आहे. प्रवासी आणि रिक्षा संघटनेच्या नेत्यांच्या अंदाजानुसार अशा पद्धतीने किमान ५ हजार रिक्षा बेकायदा रस्त्यांवर धावत आहेत. कल्याण-डोंबिवलीतील अधिकृत रिक्षांची संख्या सुमारे २५ हजार आहे. वाहतूक पोलीस व आरटीओची कृपादृष्टी अशीच राहिल्यास शहरातील रस्त्यांवर अधिकृत रिक्षांच्या तुलनेत बेकायदा रिक्षांची संख्या अधिक दिसेल, असे प्रवासी संघटनांचे मत आहे.नवीन रिक्षा घेतल्यास तीन ते चार वर्षांनंतर देखभाल, दुरु स्तीचा खर्च सुरू होतो. त्या अवधीत कर्ज फिटल्याने अनेक रिक्षाचालक त्याच परमीटवर नवी रिक्षा चालवायला घेतात. जुन्या रिक्षावर तुटपुंज्या पगारावरील एखादा ड्रायव्हर नेमला की एका परमीटवर २ रिक्षा धावू लागतात. एकाच नंबरच्या दोन किंवा अधिक रिक्षाही रस्त्यांवर धावत असल्याचे अनेक रिक्षाचालकांनी सांगितले. दोन्ही रिक्षांचे उत्पन्न मिळत असल्याने रिक्षाचालक खूष असतात. अशी रिक्षा आरटीओने पकडली तरी दंड भरु न सोडवता येते. अगदी जप्तीची कारवाई झाली तरी रिक्षा भंगारात जाण्याच्या स्थितीत असल्याने रिक्षा चालकांना फारसा फरक पडत नाही. त्यामुळेच बोगस रिक्षा बोकाळल्या आहेत. या भागांत प्रमाण मोठेडोंबिवली पश्चिमेकडील देवीचापाड, कुंभारखानपाडा, सत्यावान चौक, उमेशनगर आणि जुनी डोंबिवली तर पूर्वेतील मानपाडा रोड, टाटानाका, दावडी सागाव, सोनारपाडा ग्रामीण भाग, यामार्गांवर बेकायदा रिक्षा मोठ्या प्रमाणात आढळतात. कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा आणि खडेगोळवली मार्गावर,तसेच संध्याकाळनंतर कल्याण पश्चिमेतही अवैध रिक्षा धावतात. ५ हजारांहून अधिक बेकायदा रिक्षा!कल्याण डोंबिवलीत ५ हजारांपेक्षा जास्त बेकायदेशीर रिक्षा असाव्यात. केवळ परमीट नूतनीकरणासाठी आलेल्या रिक्षांची तपासणी करण्याऐवजी आरटीओ अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली तर या रिक्षा सापडतील. आरटीओ यंत्रणेकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याने, अशी अचानक तपासणीच होत नाही. त्यामुळे बेकायदा रिक्षाचालकांचे फावले आहे. बेकायदा रिक्षा चालविण्यासाठी १ हजार रू पयांचे हप्ता दिला जातो, असे बोलले जात आहे.कल्याण डोंबिवलीत सुमारे १५० अधिकृत आणि अनधिकृ त रिक्षा स्टॅँन्ड आहेत.त्यातील बोटावर मोजण्या इतक्या रिक्षा स्टॅँन्डला रेलींग बसविण्यात आले आहे. मात्र उर्वरीत रिक्षा स्टॅँन्डला रेलींग न बसविल्याने शहरातील बहुतांश भागात वाहतूक कोंडी होत असते. रेलिंग नसल्याचा फायदा घेऊन अनेक बेशिस्त रिक्षाचालक रस्त्याच्या मध्ये वेडीवाकडी रिक्षा लावून धंदा करतात. हे दृष्य दररोज समोर दिसत असूनही वाहतूक पोलीस डोळयावर पट्टी बांधून असतात, असे प्रवासी संघटनांचे मत आहे.