शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारमध्ये स्वाइनचे ४२ तर डेंग्यूचे १९ रुग्ण

By admin | Updated: October 3, 2015 02:20 IST

वसई-विरारमध्ये डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि मलेरिया या रोगांचे थैमान सुरू असून अनेक रुग्ण खाजगी आणि सरकारी इस्पितळांत दाखल आहेत

वसई : वसई-विरारमध्ये डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि मलेरिया या रोगांचे थैमान सुरू असून अनेक रुग्ण खाजगी आणि सरकारी इस्पितळांत दाखल आहेत. अनेक रुग्णांनी मुंबईतील केईएम तसेच अन्य सरकारी रुग्णालयांत धाव घेतली आहे. स्वाइनने ५ तर डेंग्यूने दोघे दगावल्याने चिंतेचे वातावरण आहे.स्वाइन फ्लूच्या ६९ संशयित रुग्णांपैकी ४२ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून या रोगामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, डेंग्यूचे ६० रुग्ण आढळले असून १९ जण बाधित आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अनेक रुग्णांनी मुंबईतील सरकारी रुग्णालय गाठले आहे. मात्र, या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वसई-विरारमधील नागरिकांची यादी मनपाकडे पाठवण्यात येत नसल्याने आकडेवारी मिळू शकत नसल्याचे मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपमा राणे यांनी लोकमतला सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. राणे म्हणाल्या, मनपाच्या हद्दीत या दोन्ही रोगांचे रुग्ण आढळले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. फक्त ग्रामीण भागात किती रुग्ण आहेत, याची आकडेवारी कळू शकत नाही. ती माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आपापल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत द्यायला हवी. शहरी तसेच ग्रामीण भागातील डॉक्टरांचे दवाखाने रुग्णांनी भरलेले दिसतात. औषध फवारणी, गटारांत औषध टाकणे, अशा महत्त्वाच्या कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे या रोगांचा फैलाव रोखणे प्रशासनाला शक्य होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.