शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 14:35 IST

कळवा पोलिसांनी बुधवारी याची माहिती दिली. यामध्ये तिसऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून, त्याची भिवंडीतील बाल निरीक्षण गृहात रवानगी केली आहे. 

ठाणे : कळवा येथील शांताबाई चव्हाण (४०) या नाका कामगार महिलेच्या हत्येप्रकरणी विश्वजीत राजेंद्रप्रसाद सिंग (३०) आणि देवराज मदन कुमार या दोघांना अटक करण्यात आली आहे. कळवापोलिसांनी बुधवारी याची माहिती दिली. यामध्ये तिसऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून, त्याची भिवंडीतील बाल निरीक्षण गृहात रवानगी केली आहे. 

हत्या करण्यात आलेल्या महिलेच्या अंगावरील काही दागिने आणि पाच हजार रुपये चोरल्याची कबूली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली. 

१४ जून रोजी झाली होती हत्या

कळव्यातील कावेरी सेतू रस्त्यालगत बांधकाम चालू असलेल्या एका नवीन इमारतीमध्ये १४ जून २०२५ शांताबाई या महिलेची हत्या झाली होती. शस्त्राने वार करुन तसेच गळा आवळून तिचा खून केला गेला होता. 

कळवा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांची तीन पथके आरोपींचा शोध घेत होती. कळवा रेल्वे स्थानकापासून कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत एकूण शंभरच्या आसपास सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पोलिसांनी पडताळणी केली. 

बिहारमध्ये जाऊन केली अटक

स्थानिक रिक्षा चालक, हॉटेल व्यावसायिकांकडे चौकशी करण्यात आल्यानंतर तीन आरोपी असल्याची बाब यात आढळली. आरोपी परराज्यात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची पथके बिहार राज्यातील खगडीया जिल्ह्यात गेली. विश्वजीत सिंग आणि देवराज कुमार तसेच १७ वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाला सहायक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांच्या पथकाने ताब्यात घेतले.

विश्वजीत आणि देवराज यांना १९ जून रोजी अटक केली. न्यायालयाने त्यांना १ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. तिच्याकडील ३५ हजारांचे दागिने आणि पाच हजार रुपये अशा ४० हजारांसाठी तिची हत्या केल्याची त्यांनी कबूली दिली. 

कळव्यातील सीमा हाईटस इमारतीमध्ये कामाच्या बहाण्याने त्यांनी या महिलेला नेले तिथेच तिची हत्या केली. आरोपींकडून देशी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसेही हस्तगत केली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalwaकळवाPoliceपोलिसthaneठाणे