शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या ‘प्लास्टिक बंदी’ला गणेशोत्सवात हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:47 IST

अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : सध्या गणेशोत्सवात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्लास्टिक बंदी संकल्पनेला हरताळ फसला गेला आहे. दीड ...

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : सध्या गणेशोत्सवात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्लास्टिक बंदी संकल्पनेला हरताळ फसला गेला आहे. दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनावेळी निर्माल्यात मागील वर्षापेक्षा जास्त प्लास्टिक आढळून आले आहे. त्यामुळे निर्माल्य संकलन करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

गणेशमूर्तींच्या विसर्जनावेळी डोंबिवली पश्चिमेतील कोपर, गणेशघाट, जुनी डोंबिवली, रेतिबंदर, सातपूल जेट्टी, कुंभारखान पाडा, ठाकुर्लीतील चोळेगाव तलाव, एमआयडीसीतील मिलापनगर तलाव, नेहरुनगर या विसर्जनस्थळांवर सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक निर्माल्य संकलनाचे काम करत आहेत. मागील वर्षी महापालिका हद्दीत २४ ठिकाणी सामाजिक, पर्यावरणीय संस्थेचे कार्यकर्ते कार्यरत होते. यंदा दीड दिवसांच्या विसर्जनावेळी वरील नऊ ठिकाणी सुमारे १०० स्वयंसेवकांनी निर्माल्य संकलित केले. त्यात प्लास्टिकचे प्रमाण सर्वाधिक होते.

उत्सवकाळातील प्रदूषण टाळण्यासाठी नियमांचे पालन केले पाहिजे. अन्यथा पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होईल. त्याच्या दुष्परिणामांना आपल्याला सगळ्यांना सामोरे जावे लागेल असा, धोक्याचा इशाराही पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला. गेल्यावर्षी सुमारे ५० टन निर्माल्य जमा झाले होते, त्यात जेवढे प्लास्टिक नव्हते, त्यापेक्षा जास्त प्लास्टिक पहिल्या दीड दिवसांत जमा झाल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.

केडीएमसीने शून्य कचरा मोहीम राबविताना प्लास्टिक टाळून कापडी पिशव्या वापरण्याबाबत जागृती केली होती. त्यामुळे नागरिकही स्वतःहून कागदी, कापडी घेऊनच बाजारात जात होते. शिवाय दुकानदारही त्या पिशव्या देत होते. कचराही कागदात गोळा करायला लागले होते पण अल्पावधीत त्यांनी पुन्हा प्लास्टिकचा वापर सुरू केला आहे. फेरीवालेही प्लास्टिकच्या पिशव्यांतून भाजीपाला, फळे व अन्य साहित्य देत असल्याचे दिसून येत आहे.

--------------

दीड दिवसांच्या विसर्जनावेळी निर्माल्य संकलनात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक जमा झाले. मागीलवर्षी अनंत चतुर्दशीला जेवढे जमा झाले होते तेवढे आताच दीड दिवसांच्या विसर्जनाच्या दिवशी गोळा झाले आहे. त्यामुळे निर्माल्य किती टन संकलन झाले, यापेक्षा प्लास्टिक वाढले हे गंभीर आहे.

- रुपाली शाईवाले, पर्यावरण दक्षता मंडळ, डोंबिवली

----------

नागरिक सुधारणार कधी?

प्रत्येक गोष्ट प्लस्टिकमध्ये गुंडाळून टाकली जात आहे. गणेशोत्सवात दीड, दोन दिवसांत सुमारे १० टन निर्माल्य संकलित झाले आहे. त्यात प्लास्टिकचे प्रमाण खूप आहे. नागरिकांनी स्वत:ला शिस्त लावली तरच पर्यावरण राखले जाईल. सिंधुदुर्ग, कर्जत, माथेरानमध्ये नागरिकांनी स्वतःहून सुधारणा केलीच की? केडीएमसी हद्दीत मात्र नागरिकांना समजावून सांगताना खूप अडथळे येत आहेत. प्लास्टिक सोडून कागद वापरण्याची सवय लावायला हवी.

- रामदास कोकरे, उपयुक्त, घनकचरा विभाग, केडीएमसी

-----------------

------------