शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात ‘नव भारत साक्षरता’ चाचणीस उत्स्फूर्त प्रतिसाद; १४ हजारांनी दिली मूल्यमापन चाचणी

By सुरेश लोखंडे | Updated: September 22, 2025 18:01 IST

सर्वाधिक ८० टक्के महिलांची या परीक्षेला उपस्थिती हाेती, असा दावा ठाणे जिल्हा परिषदेच्या याेजना शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.      

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यात ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा रविवारी ठाणे जिल्ह्यातील एक हजार ९६८ परीक्षा केंद्रांवर पार पडली. या चाचणीसाठी एकूण १९ हजार ८२८ परीक्षार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी १४ हजार ९६ असाक्षरांनी चाचणीला उपस्थिती लावली. यामध्ये सर्वाधिक ८० टक्के महिलांची या परीक्षेला उपस्थिती हाेती, असा दावा ठाणे जिल्हा परिषदेच्या याेजना शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.            

केंद्र सरकारच्या ‘उल्लास’ अॅपच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या असाक्षर प्रौढांसाठी ही चाचणी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील ही पहिली मूल्यमापन चाचणी असून दुसरी चाचणी परीक्षा मार्चमध्ये घेण्यात येणार आहे. या पार पडलेल्या चाचणी परीक्षेसाठी मीरा भाईंदर महापालिका शहरातून तीन हजार ९ जणांची नाेंदणी झाली हाेती. तर या परीक्षेला सर्वाधिक एक हजार ७५५ जणांची उपस्थिती शहापूर तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर हाेती. याप्रमाणेच उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड व भिवंडी तालुक्यांमध्येही समाधानकारक प्रतिसाद हाेता. जिल्ह्यातील एकूण १९६८ परीक्षा केंद्रांवर ही मूल्यमापन चाचणी घेण्यात आली.

पुढील टप्यात डिजिटल साक्षरता -

ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने साक्षरतेचा पाया मजबूत करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण चाचणी आयोजित केली असून, या माध्यमातून असाक्षर प्रौढांना ‘नवसाक्षर’ बनविण्याचे उद्दिष्ट आहे. चाचणीमुळे त्यांचा भाषा व गणितातील प्राथमिक ज्ञानावर आधारित प्रगतीचा आढावा घेता येणार आहे. या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करून यशस्वी उमेदवारांना नवसाक्षरतेचा दर्जा देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात डिजिटल साक्षरता व कौशल्यविकासाचे प्रशिक्षण देण्याचा विचार शिक्षण विभाग करत आहे.

एकूण आकडेवारी:

एकूण नोंदणी - १९,८२८

एकूण उपस्थित परीक्षार्थी - १४,०९६

एकूण परीक्षा केंद्रे - १,९६८

महिला परीक्षार्थी - ११,३९४

पुरुष परीक्षार्थी - २,७०२

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षण