शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
3
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
4
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
5
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
6
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
7
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
8
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
9
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
10
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
11
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
12
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
13
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
14
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
15
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
16
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
17
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
18
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
19
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
20
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

शिवसेना, भाजपची ऑफर धुडकावली; आव्हाड यांचा गौप्यस्फोट, पवारांची साथ न सोडण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 07:50 IST

मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत उद्धव ठाकरे यांनी आपल्याला ठाण्याचा जिल्हाप्रमुख होण्यासाठी ऑफर दिली होती, तसेच भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडून आमदारकीचा  प्रस्ताव आपल्यापुढे ठेवला होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटद्वारे केला.

ठाणे : स्व. आनंद दिघे यांच्या निधनानंतर  मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत उद्धव ठाकरे यांनी आपल्याला ठाण्याचा जिल्हाप्रमुख होण्यासाठी ऑफर दिली होती, तसेच भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडून आमदारकीचा  प्रस्ताव आपल्यापुढे ठेवला होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटद्वारे केला. ऑफर नाकारली तरी त्यावेळी मुंडे यांनी आपल्यावर कधीच आकस ठेवला नाही, असा टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मोठ्या रकमेच्या आमिषाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जात असल्याच्या चर्चेला उधाण आले असताना आव्हाड यांनी आपल्या पक्षनिष्ठेचा भावनिक मुद्दा केला आहे. आपल्या राजकीय कारकीर्दीचा प्रवास मांडताना आव्हाड म्हणाले की, मी साधारण १९८७ मध्ये शरद पवार यांच्या संपर्कात आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. त्यानंतरच्या दोन घटनांत आपल्यालाही पदाचे आमिष दाखवले गेले. एके दिवशी सकाळी ७ वाजता मुंडे यांनी प्रमोद महाजन यांच्याशी चर्चेनंतर आमदारकीचा प्रस्ताव माझ्यापुढे ठेवला होता. त्यावेळी पवार यांना सोडणार नाही, असे आपण त्यांच्या पत्नीमार्फत स्पष्ट कळवले होते. मात्र, माझ्या नकाराचा मुंडे यांनी कधीच आपल्यावर  राग ठेवला नाही. त्यानंतरही ते मला माेकळेपणाने सतत भेटत राहिले, अशी आठवणही आव्हाड यांनी सांगितली. दुसरी घटना, आनंद दिघे यांच्या निधनानंतरची आहे. रघुनाथ मोरे हे जिल्हाप्रमुख झाले. त्यांचाही अपघात झाला. त्याच काळात संघर्ष संस्थेच्या कार्यालयात देवीदास चाळके बसले होते. त्यावेळी  मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होण्याची ऑफर दिली होती. मातोश्रीशी निष्ठावान राहील असा कोणीतरी आम्हाला जिल्हाप्रमुख करायचा आहे, तू विचार करून सांग, असे नार्वेकर म्हणाले. त्यावेळीही आपण पवार यांची साथ सोडणार नाही, तुम्ही माझा एवढा विचार केलात, त्याबद्दल मी आभारी असल्याचे नार्वेकर यांना म्हटले होते, असे आव्हाड यांनी सांगितले.

हिशेबावर निष्ठा ठरत नसतात -- २०१४ आणि २०१९ मध्ये पवार यांनी आपल्याला मंत्री केले. -  सर्वच राजकीय संकटांमध्ये  ते कायम पाठीशी उभे राहिले. -  त्यामुळे काही मिळो किंवा न मिळाे आपण त्यांची साथ सोडणार नाही. -  हिशेबावर निष्ठा ठरत नसतात, असा टोला आव्हाड यांनी स्वपक्षाच्या माजी नगरसेवकांना लगावला. -  तुम्हाला ज्यांनी घडविले, त्यांच्यासोबत तुम्ही घडल्यावर कसे वागता, याचा विचार प्रत्येक माणसाने स्वत:हून करायला हवा. -  स्वत:ला भाव लावून विकणाऱ्यांची किळस येते, अशा शब्दांत त्यांनी माजी नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस