शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 21:24 IST

'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान पाकिस्तानने सीमेवर केलेल्या गोळीबारात गौरीच्या पायाला गोळी लागली होती.

Jammu-Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान, जम्मू-काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून भीषण गोळीबार करण्यात आला होता. त्यात 'गौरी' नावाच्या गाईच्या पायाला गोळी लागल्यामुळे, तिचा पाय कापावा लागला होता. गोळी लागल्यामुळे गौरी जगणार नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, जगण्याची तीव्र इच्छा असलेली गौरी जगली आणि आता तिला नवीन पायदेखील मिळला आहे.  

आजतकच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी गोळीबारात जखमी झालेल्या गौरीला भारतात तयार केलेला खास कृत्रिम पाय 'कृष्णा लिंब' लावला आहे. हा कृत्रिम पाय खासकरुन जनावरांसाठी तयार करण्यात आला असून, यामुळे गौरीला नवीन आयुष्य मिळाले आहे. या कृत्रिम पायामुळे गौरी पूर्वीप्रमाणे चालू शकते. अॅनिमल प्रोस्थेसिस क्षेत्रातील नावाजलेले डॉक्टर तपेश माथुर यांनी हा पाय तयार केला आहे. विशेष म्हणजे, माथुर यांनी आतापर्यंत 22 राज्यातील हजारो दिव्यांग जनावरांना नवीन आयुष्य दिले आहे. 

महत्वाचे म्हणजे, गरिबांच्या जनावरांसाठी ते मोफत सेवा देतात. त्यांना या कामासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘गौरी’ला लावलेला कृत्रिम पाय फक्त तिला चालण्यात मदत करणार नाही, तर सीमावर्ती भागात जखमी झालेल्या इतर जनावरांसाठी आशेचा किरण घेऊन आला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला

22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन परिसरात दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये 26 नेक पर्यटकांचा मृत्यू झाला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूरद्वारे कठोर कारवाई केली. यादरम्यान, पाकिस्तानी सैन्याने पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रांचा वापर करुन अनेक हल्ले केले. मात्र, भारतीय संरक्षण दलांनी हे हल्ले पूर्णपणे हाणून पाडले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरJammu Kashmirजम्मू-काश्मीरFiringगोळीबार