शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
2
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
3
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
4
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
5
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
6
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
7
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
8
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
9
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
10
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
11
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
17
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
18
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
19
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
20
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
Daily Top 2Weekly Top 5

इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 21:08 IST

Iran Foreign Minister Abbas Araghchi In Delhi: अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. आम्हाला केवळ आदराची भाषा समजते, असे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिल्लीत म्हटले आहे.

Iran Foreign Minister Abbas Araghchi In Delhi: ब्रिक्स सदस्य देशांच्या दोन दिवसीय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रशिया, इराणचे परराष्ट्र मंत्री भारतात आहेत. अमेरिकाइराण युद्ध, जागतिक तेल संकट, रशिया युक्रेन युद्ध अशा मुद्द्यांमुळे ही शिखर परिषद महत्त्वाची ठरत आहे. यातच इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताची भूमिका महत्त्वाची असून, आम्ही स्वागत करू, असे म्हटले आहे. 

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, इराणशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर लष्करी कारवाई हा तोडगा असू शकत नाही. इराण एका अकारण आक्रमणाचा बळी ठरला आहे. जर समोरची बाजू गंभीर असेल, तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. अमेरिकेवर विश्वास न ठेवण्याची आमच्याकडे सर्व कारणे आहेत. ते त्यांचे कोणतेही उद्दिष्ट साध्य करू शकलेले नाहीत. या प्रदेशात शांततेसाठी भारत जी कोणतीही भूमिका बजावू शकेल, त्याचे आम्ही स्वागत करू, असे अराघची यांनी म्हटले आहे.

आम्ही मुत्सद्देगिरीसाठीही तयार आहोत

अराघची यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितले की, कदाचित पुन्हा लढाई सुरू होईल, पण आम्ही मुत्सद्देगिरीसाठीही तयार आहोत. अमेरिकेकडून येणाऱ्या अविश्वास आणि परस्परविरोधी संदेशांमुळे सध्याच्या चर्चेत अडथळा येत आहे. मला आशा आहे की अखेरीस मुत्सद्देगिरीचाच विजय होईल. इराणने कधीही अण्वस्त्रांची मागणी केलेली नाही. ते आमचे धोरण नाही, असेही त्यांनी नमूद केले. आमचा अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. कोणत्याही राजनैतिक प्रयत्नांमधील हा सर्वांत मोठा अडथळा आहे, असेही अराघची यांनी स्पष्ट केले. 

अत्यंत क्रूर युद्धात निकराने लढा दिला

आमच्याविरुद्ध पुकारल्या गेलेल्या एका अत्यंत क्रूर युद्धात निकराने लढा दिला आहे. त्यांना (अमेरिकेला) आपली कोणतीही उद्दिष्टे साध्य करता आली नाहीत. हे स्पष्ट आहे की, ज्या गोष्टी त्यांना लष्करी बळावर साध्य करता आल्या नाहीत, त्या गोष्टी त्यांना वाटाघाटींच्या मेजावरही साध्य करता येणार नाहीत. अर्थात, जोपर्यंत दोन्ही पक्षांचा फायदा होईल असा एखादा तोडगा निघत नाही, असेही अराघची यांनी सांगितले.

दरम्यान, सध्या युद्धविराम लागू आहे. परंतु, परिस्थिती खूप अस्थिर आहे. असे असले तरी युद्धविराम टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जेणेकरून राजनैतिक चर्चेला संधी मिळू शकेल. त्यांनी आमची वारंवार परीक्षा घेतली आहे. आम्ही कोणत्याही दबावाला किंवा धमक्यांना कधीही बळी पडत नाही. आम्ही कोणत्याही निर्बंधांनाही विरोध करतो. इराणी जनतेला केवळ आदराचीच भाषा समजते, असे अब्बास अराघची यांनी म्हटले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran calls India for peace role; ready for talks.

Web Summary : Iran urges India to play a peaceful role amid global tensions. Ready for dialogue, Iran distrusts US, seeks resolution benefitting all parties and emphasizes that they never wanted nuclear weapons.
टॅग्स :IranइराणIndiaभारतIndiaभारतUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरAmericaअमेरिका