शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्यांमुळे सामान्यांना दिलासा

By admin | Updated: November 3, 2015 01:04 IST

आवक घटल्यामुळे फळभाज्या महागल्या तरी आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे गृहिणींना काहीसा दिलासा लाभला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत

ठाणे : आवक घटल्यामुळे फळभाज्या महागल्या तरी आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे गृहिणींना काहीसा दिलासा लाभला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्यांचे प्रतिकिलो १० रुपयाने वधारले असून मागील आठवड्यात २० ते ३० रुपये किलोने विकले जाणारे टोमॅटो या आठवड्यात ६० रुपये किलोने विकले जात आहेत. तर ५० रुपये किलोने विकली जाणारी गवार ८० रुपयाने विकली जात असून १२० रुपयाने मिळणारा मटार १५० रुपये किलोने मिळत आहे. भाव वधारण्याचे मुख्य कारण माल कमी झाल्याने तसेच आॅक्टोबर हिटमुळे भाज्या खराब झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वाशी, कल्याण, नाशिक , पुणे येथून भाज्या येतात. मात्र नाशिकहून येणारी भाजी ही स्वस्त आणि ताजी असली तरी देखील ट्रान्सपोर्टेशन महाग असल्याने मुंबईत दाखल होईपर्यंत तीचे भाव वधारतात. त्यामुळे त्याचे भावही वधारलेले असतात. मागील आठवड्यात १२० रुपये किलोने विकली जाणारी मटार या आठवड्यात १५० रुपयाने विकली जात आहे. मात्र पालेभाजीचे भाव घसरल्याने मागील आठवड्यात ३० रुपयाने मिळणारी मेथीची एक जुडी या आठवड्यात २० रुपयाने मिळत आहे. गाजराचा मौसम असूनही गावठी गाजरे बाजारात विक्रीस आली नसल्याचे विक्रेत्यांनी स्पष्ट केले. पाऊस व अतिउष्णता या नैसर्गिक संकटांमुळे मुळातच भाज्यांची आवक कमी असल्याचे विक्रेत्यांनी नमूद केले. भाजी आताचे भावमागील भाव भेंडी ४० ३० भरीत वांगी ६० ६० चायना वांगी ४० ४० कारली४०५० गवार ८० ५०प्लॉवर ५० ५०कोबी ३० ४०फरसबी ८० १२०मटार १२० १५०पालक १०(जुडी) २०(जुडी)मुळा १० (जुडी) २० (जुडी)