शहरं
Join us  
Trending Stories
1
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
2
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
3
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
4
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
5
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
6
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
7
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
8
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
9
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
10
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
11
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
12
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
13
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
14
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
15
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
16
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
17
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
18
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
19
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
20
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांची जोरदार धडक

By admin | Updated: March 22, 2016 02:10 IST

गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाही या प्रकल्पात बाधित झालेल्या रहिवाशांचे कल्याण-डोंबिवली महापालिकेने पुनर्वसन केलेले नाही.

कल्याण : गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाही या प्रकल्पात बाधित झालेल्या रहिवाशांचे कल्याण-डोंबिवली महापालिकेने पुनर्वसन केलेले नाही. बीएसयूपी योजनेंतर्गत बांधलेल्या घरकुलांमध्ये तातडीने त्यांचे पुनर्वसन करा, या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी महापालिका मुख्यालयावर सोमवारी
धडक मोर्चा काढला.
पश्चिमेकडील दुर्गाडी चौक ते शिवाजी चौक ादरम्यान होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून महापालिका प्रशासनाने २००५ मध्ये गोविंदवाडी बायपास मार्गाचे काम हाती घेतले. त्या वेळी प्रकल्पात बाधित होणाऱ्या रहिवाशांना बीएसयूपी योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरकुलांमध्ये पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु, त्या आश्वासनाला ११ वर्षे उलटूनही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेच नाही, याकडे मोर्चेकऱ्यांनी लक्ष वेधले. प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाच्या अनुषंगाने सांगितल्या जात असलेल्या अटी जाचक असल्याचा आरोप त्यांनी केला. २६ जुलै २००५ ला प्रलंयकारी महापुरात मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे नष्ट झाली. त्यामुळे पुरावा सादर करू शकत नसल्याने बहुतांश प्रकल्पग्रस्तांना हक्काच्या घराला मुकावे लागत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मोर्चा महापालिका मुख्यालयावर धडकताच शिष्टमंडळाने बीएसयूपी पुनर्वसन समितीचे सहायक आयुक्त प्रकाश ढोले यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. गोविंदवाडी प्रकल्पग्रस्तांची यादी ७५० जणांची असताना हजारोंच्या आसपास लाभार्थी पावत्या कशा दिल्या गेल्या, असा सवालही या वेळी करण्यात आला. (प्रतिनिधी)