शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

आपला दवाखाना ही काळाची गरज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 01:44 IST

ठाण्यातील गोरगरीब रहिवाशांच्या आरोग्यासाठी महापालिकेने धोरणात्मक पाऊल उचलले आहे. दिल्लीत आप सरकारच्या लोकप्रियतेस कारणीभूत ठरलेल्या मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर महानगरपालिकेने ठाण्यात आपला दवाखाना ही संकल्पना राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ठाण्यात महापालिकेची आरोग्य केंद्रे अगोदरच कार्यरत आहेत.

- अजित मांडकेदिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने ठाण्यातही आपला दवाखाना ही संकल्पना राबवण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, या प्रस्तावाला मंजुरीसुद्धा मिळाली आहे. विरोधकांनी मात्र या संकल्पनेवर केल्या जाणाऱ्या सुमारे १६0 कोटींच्या खर्चावर आक्षेप घेतला आहे. महापालिकेची आरोग्य केंद्रे अगोदरच कार्यरत असताना आणि लोकसंख्येच्या तुलनेत ५० केंद्रांची गरज नसताना केवळ पैशांची उधळपट्टी करण्यासाठी आणि ठाणेकरांना चांगली सुविधा देण्याच्या नावाखाली हा आणखी एक भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. परंतु, शहराची वाढती लोकसंख्या, शासकीय रुग्णालयांवर वाढत असलेला ताण आणि गोरगरीब रुग्णांना आपल्या घराजवळच कोणताही खर्च न करता मोफत उपचार मिळत असल्याने ही संकल्पना योग्य असून देशाने, राज्याने ही संकल्पना मान्य केली आहे. ही काळाची गरज असल्याचे पालिकेने स्पष्ट केले असून त्यामुळेच ही संकल्पना राबवली जात असल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे.यापूर्वी दिल्लीत आप पक्षाने मोहल्ला क्लिनिक ही संकल्पना राबवली आहे. त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेने शहरात आपला दवाखाना ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला किसननगर आणि महात्मा फुलेनगर भागात ही संकल्पना राबवली गेली. या दोन्ही केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता ही संकल्पना शहरभर राबवण्याचा निर्णय पालिकेने घेतला. या उपक्रमावर पुढील पाच वर्षांसाठी पालिका १६० कोटींचा खर्च करणार आहे. या खर्चावर विरोधी बाकावरील राष्टÑवादीने आक्षेप घेतला आहे. शहराच्या विविध भागांत एकूण ५० आपला दवाखाना (ई-हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्याचा निर्णय ठामपाने घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेने मेडिकल आॅन गो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये ‘आपला दवाखाना (ई-हेल्थ स्मार्ट क्लिनिक) ही संकल्पना राबवण्यास शुक्रवारी महासभेत विरोधकांचा विरोध डावलून मंजुरीही दिली.दरम्यान, आरोग्य केंदे्र सुरू करताना दर ५० हजार नागरिकांमागे एक आरोग्य केंद्र असावे, असा नियम आहे. ठाणे शहराची लोकसंख्या सध्या २६ लाखांच्या घरात आहे. त्यापैकी ५० टक्के लोक हे चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास आहेत. या आरोग्य केंद्रांचा वापर करणारी लोकसंख्या पाहता ठाणे शहरात २६ आरोग्य केंद्रांची गरज आहे. आजमितीला ठाण्यात २८ आरोग्य केंद्रे आहेत. त्यामुळे अतिरिक्त ५० केंद्रे सुरू करून ठाणेकरांच्या १६० कोटीरुपयांची उधळपट्टीच केली जाणार असल्याचे मत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले आहे. ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि शासनाच्या सिव्हील रुग्णालयामध्ये ज्या सुविधा मोफत मिळत आहेत, त्या सुविधांसाठीही या ‘आपला दवाखाना’मध्ये १० रुपये दर आकारला जाणार आहे. शिवाय, ही संकल्पना सर्वात आधी किसननगर आणि कळवा येथे राबवण्यात आली होती. मात्र, ती फोल ठरलेली आहे. या केंद्रांवर एकही रुग्ण फिरकत नाही. तरीही, आणखी ५० ठिकाणी ही योजना राबवण्याचा घाट घातला जात असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. ‘आपला दवाखाना’मुळे ठाणे महानगरपालिकेला पाच वर्षांसाठी १४४ कोटी आणि भांडवली खर्चापोटी १५.६० कोटी रुपये असे सुमारे १५९.६० कोटी रुपये मेडिकल आॅन गो प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीला द्यावे लागणार आहेत. हा ठाणेकरांच्या पैशांचा अपव्ययच असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.सायंकाळीही मिळणार आरोग्य सुविधादिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाण्यात महापालिकेने ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे शहराची लोकसंख्या २६ लाखांच्या घरात आहे. त्यातील जवळपास निम्मी लोकसंख्या झोपडपट्टी आणि चाळीत वास्तव्यास आहे. त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि महापालिकेची २७ आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील आरोग्य सुविधांवर ताण येत असून रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होताना दिसत नाहीत.सकाळच्या वेळेतच लोकांना आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध होतात. परंतु, सायंकाळच्या वेळेत मात्र कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे सायंकाळच्या वेळेत आपला दवाखाना ही संकल्पना राबवली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे यांनी दिली.आपला दवाखानाच्या माध्यमातून ही सेवा सायंकाळी ५.३० ते रात्री ९.३० यावेळेत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शिवाय, या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणाºया रुग्णाला १०० टक्के मोफत उपचार मिळणार आहेत. दरम्यान, या उपक्रमाचा पहिला पायलेट प्रोजेक्ट शिवाजीनगर आणि खारेगाव या भागांत राबवण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने हा निर्णय घेतल्याचेही केंद्रे यांनी स्पष्ट केले.या संकल्पनेत दवाखाना उभारणीचा खर्च, त्याठिकाणी लागणारी उपकरणे, साहित्य आणि जागा भाड्याने घेणे, हा खर्च संबंधित संस्थाच करणार आहे. एक ‘आपला दवाखाना’ सुरू करायचा असेल, तर त्याच्या निर्मितीसाठी ४३ लाख ४७ हजार रु पये खर्च अपेक्षित असून हा सर्व खर्च नियुक्त संस्थेमार्फत केला जाणार आहे.या दवाखान्यात येणाºया रुग्णांची वैद्यकीय तपासणी आणि औषधांचा खर्च महापालिका करणार आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला त्याच्या घरापासून अगदी जवळच्या ठिकाणी आणि वेळेत उपचार मिळणार आहेत. त्यामुळे ही संकल्पना योग्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलthaneठाणे