शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बेकायदा रेती वाहतूकप्रकरणी एक अधिकारी, १२ कर्मचाऱ्यांच्या बदलीने पोलिसांत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 00:05 IST

पालघर पोलीस अधीक्षकांची कारवाई : वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या चौकशीचे आदेश

नालासोपारा : पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी शनिवारी संध्याकाळी खर्डी आणि खानिवडे रेतीबंदरावर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सापळा रचून धाड मारली होती. या धाडीत १५२ सक्शन पंप, १६५० ब्रास रेती, २३० बोटी, १ जेसीबी असा ७ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी विरार पोलिसांना दोषी मानून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे आणि सहायक पोलीस निरीक्षक पंडित कल्याणराव मस्के यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे, तर मांडवी दूरक्षेत्रातील एक पोलीस अधिकारी आणि १२ पोलीस कर्मचारी यांची बदली केल्याने पालघर पोलिसांमध्ये एकच खळबळ माजली आहे.

गुन्ह्यात जप्त केलेल्या २३० बोटी, १५२ सक्शन पंप यांची विल्हेवाट लावण्याबाबत न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्याच अनुषंगाने महसूल विभागाने या ठिकाणचे सक्शन पंप आणि बोटी तोडण्याचे व गुन्ह्यात जप्त मुद्देमालाची, साहित्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विरार पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे आणि सहायक पोलीस निरीक्षक पंडित कल्याणराव मस्के यांना विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती उत्खनन होत असल्याचे माहीत असतानाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहे.विरार पोलीस ठाणे अंतर्गत मांडवी पोलीस दूरक्षेत्र हद्दीत मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन होत असताना त्यांनी रेती माफियांविरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी एक पोलीस अधिकारी आणि १२ पोलीस कर्मचारी यांची बदली केली आहे. कर्तव्यात कसुरी केली म्हणून सहायक पोलीस निरीक्षक पंडित कल्याणराव मस्के यांना तातडीने वसईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात सलग्न केले आहे. तसेच पोलीस हवालदार गौतम देवराम तोत्रे, पोलीस नाईक संतोष बाबू धांगडा, तानाजी अजिनाथ जाधव, सुभाष दादाराव शिंदे, भरत आत्माराम गोवारी, महेंद्र किसन पाटील, गजेंद्रसिंग बबनसिंग पाटील, विजय हिंदुराव गुरव, भूषण हरिश्चंद्र पाटील, पोलीस शिपाई नवनाथ दादा शेळके, गोविंद बळीराम मुसळे आणि उत्तम अमृत भोये यांचीही बदली करण्यात आली आहे. 

टॅग्स :thaneठाणेsandवाळूPoliceपोलिस