शहरं
Join us  
Trending Stories
1
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
2
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
3
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
4
हे दशक आपत्तींचे; गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा 
5
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
6
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
7
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
8
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
9
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
10
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
11
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
12
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
13
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
14
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
15
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
16
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
17
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
18
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
19
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
20
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्विकासाचे धोरणच नाही

By admin | Updated: March 8, 2016 01:57 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ६८६ धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्याच्या मागणीसाठी गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे.

मुरलीधर भवार,  कल्याण
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ६८६ धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्याच्या मागणीसाठी गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. त्यावर पालिकेचे धोरण मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. पण त्या नोटीशीला पालिकेने अद्याप उत्तरही दिले नसल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अमोल जोशी यांनी दिली. या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत पालिकेचे नेमके धोरण, जादा एफएसआय देण्याच्या मागणीवरही पालिकेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
डोंबिवलीतील राघवेंद्र सेवा संस्थेने या विषयावर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात नगरविकास खाते, राज्य सरकार, आरोग्य खाते, महापालिका आणि पोलिस आयुक्तांना प्रतिवादी
केले आहे. सुनील नायक, महेश साळुंकेआणि सचिन शिंदे यांनीही ही याचिका दाखल केली आहे. मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती दुरुस्त कराव्या किंवा त्यांचा पुनर्विकास करावा, अशी या याचिकेतील मुख्य मागणी आहे.
सरसकट सर्वच धोकादायक इमारतींना जास्तीचा एफएसआय देण्याची मागणी आहे. जेथे धोकादायक इमारत आहे, तेथेच तिचा पुनर्विकास व्हावा, धोकादायक इमारतीतील भाडेकरूचा हक्क अबाधित ठेवावा, विकसित इमारतीत भाडेकरुंना जागा दिल्यावरच उर्वरित फ्लॅट विकण्याची मुभा बिल्डरला द्यावी, अशा मागण्या आल्या आहेत.