शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ठाण्यात सर्वत्र नवरात्रीची धूम दीड हजार मूर्तींचे आगमन

By admin | Published: October 13, 2015 2:00 AM

आदीशक्तीच्या नवरात्रोत्सव उद्यापासून (दि.१३) सुरू होत आहे. या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सुमारे दीड हजार देवीच्या मूर्ती आणि १ हजार ९०० घटांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

ठाणे : आदीशक्तीच्या नवरात्रोत्सव उद्यापासून (दि.१३) सुरू होत आहे. या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सुमारे दीड हजार देवीच्या मूर्ती आणि १ हजार ९०० घटांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ या परिमंडळांचा समावेश होतो. या पाचही परिमंडळांमध्ये नवरात्रोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या ठिकाणी रासगरबा-दांडियाही रंगणार आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये १ हजार ४५४ दुर्गादेवीच्या मूर्ती प्रतिष्ठापना तर सुमारे १ हजार ९०० घटांची स्थापना करण्यात येणार आहेत. ठाणे शहरात सार्वजनिक स्वरूपाच्या १४४ तर घरगुती स्वरूपाच्या १९० मूर्ती आणि सार्वजनिक स्वरूपाचे १० आणि घरगुती ५२१ घट स्थापन करण्यात येणार आहेत. कल्याणमध्ये ७९ सार्वजनिक अन् २२८ घरगुती मूर्ती तर ६ सार्वजनिक आणि ९ घरगुती घटांची; उल्हासनगरात १३३ सार्वजनिक आणि १६३ घरगुती मूर्ती तर १७ सार्वजनिक आणि ३२३ घरगुती घट; अंबरनाथमध्ये सार्वजनिक १३३ मूर्ती, ११४ घरगुती मूर्ती तर ९ सार्वजनिक, ३० घरगुती घट स्थापन करण्यात येणार आहेत. तर, वागळे परिमंडळामध्ये १५१ सार्वजनिक, १४९ खासगी मूर्ती तर १४ सार्वजनिक आणि ९६२ खासगी घट प्रतिष्ठापित करण्यात येणार आहेत. दरम्यान, ठाणे शहरात या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सवाच्या काळात ठाणे पोलीस कुंभमेळ्याच्या बंदोबस्ताला गेले होते. त्यामुळे इंडो-तिबेटीयन पोलिसांना पाचारण केले होते. या वेळी हे सर्व पोलीस ठाण्यात परतले असल्यामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला नसला तरी राज्य राखीव पोलीस दल (एसआरपी) आणि होमगार्डच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि आगरी, कोळी बांधवांची कुलदेवता असलेल्या तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी येथील श्री वज्रेश्वरी, कालिका आणि रेणुका मातेच्या नवरात्र उत्सव १३ पासून साजरा होणार आहे. मात्र राज्यातील यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे सदर उत्सवावर जास्त खर्च न करता साधेपणाने करण्याचे देवस्थान समितीने निर्णय घेतला आहे.या उत्सवात ठाणे जिल्ह्याबरोबर मुंबई, नाशिक, रायगड आणि शेजारील गुजरात राज्यातील भाविकांची मोठी गर्दी होत असते. या उत्सवात मंगळवारी घटस्थापना होऊन प्रारंभ होणार आहे आणि नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम होणार असून विजयादशमीला देवीचे खास आकर्षण असलेला पालखी सोहळा संपन्न होणार आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे मंदिरावरील जास्तीची रोषणाई, फुलांची आरास, किर्तने अशा प्रकारचा खर्च न करता सदर उत्सव साधेपणाने करण्यात येणार असल्याचा देवस्थान समितीने निर्णय घेऊन एक लाखांचा धनादेश दुष्काळ निवारण फंडासाठी मंदिर समितीने दिला.नवरात्र उत्सवास उद्यापासून प्रारंभ होत असून उद्या मध्यान्हापर्यंत घटस्थापना करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली. बी पेरल्यानंतर नवव्या दिवशी अंकुर फुटतो. गर्भधारणा झाल्यावर ९ महिने ९ दिवसांनी प्रसूती होते. असा हा ९चा महिमा आहे.नवरात्र म्हणजे निर्मिती शक्तीची पूजा असून ती ९ दिवस करायला सांगितली असल्याचे सोमण यांनी सांगितले. या दिवसांत शेतात तयार झालेले धान्य घरी येते. पूर्वी लोक क्षेत्रपूजा करून सीमोल्लंघन करत असत. आज अज्ञान, आळस, अनीती, भ्रष्टाचार यातून सीमोल्लंघन करण्याची गरज आहे. यंदा राज्याचा बराच भाग अवर्षणग्रस्त असल्यामुळे शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.