शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांच्या हक्कासाठी देशव्यापी चळवळ

By admin | Updated: October 1, 2015 23:34 IST

देशातील ११ कोटी ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाने लढा सुरू केला आहे. १४ वर्षांमध्ये २० लाख नागरिक या चळवळीमध्ये सहभागी झाले आहेत.

नामदेव मोरे, नवी मुंबईदेशातील ११ कोटी ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाने लढा सुरू केला आहे. १४ वर्षांमध्ये २० लाख नागरिक या चळवळीमध्ये सहभागी झाले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना पेन्शन, आरोग्य व विरंगुळा केंद्र या प्रमुख मागण्यांसह इतर प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. भारत हा तरुणांचा देश असल्याचे प्रत्येक व्यक्ती सांगते. परंतु या देशामध्ये ११ कोटी ज्येष्ठ नागरिक राहात आहेत. यामधील अनेकांना वृद्धापकाळी सांभाळ करणारेही कोणीच नाहीत. औषधासाठी पैसे नाहीत. करमणुकीचे साधन नसल्यामुळे एकाकीपणाने ग्रासले असून अशा ज्येष्ठांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. केंद्र शासनाने १९९९ मध्ये ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले आहे. परंतु त्याची तंतोतंत अंमलबजावणी होत नाही. प्रत्येक राज्याला ज्येष्ठ नागरिक धोरण तयार करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु गोवा वगळता इतर राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे देशातील ज्येष्ठ नागरिकांनी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविण्यासाठी चळवळ सुरू केली आहे. नवी मुंबई या चळवळीचे केंद्र झाले आहे. चळवळीची मुहूर्तमेढ रोवणारे डॉ. एस. पी. किंजवडेकर वयाच्या ८३ व्या वर्षी व डी. एन. चापके वयाच्या ७४ व्या वर्षीही देशभर फिरून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. किंजवडेकर यांनी सन २००० मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यानंतर महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ व अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ या दोन संघटना उभारून राज्यातील इतर संघटनांना या छत्राखाली आणण्यास सुरवात केली. देशातील १६ राज्यांचा दौरा करून विभागनिहाय ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना बांधण्यास सुरवात केली. शासनाकडे पत्रव्यवहार करून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. ज्येष्ठ नागरिक महासंघाने १४ वर्षांच्या वाटचालीमध्ये सनदशील मार्गाने हक्कासाठीची चळवळ उभी केली आहे. देशभरातून पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना पोस्टकार्ड पाठवून समस्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक वर्षी ज्येष्ठ नागरिकांची वार्षिक परिषद आयोजित केली जाते. आतापर्यंत उदयपूर, लखनौ, विशाखापट्टनम, भोपाळ येथे परिषदा झाल्या आहेत. यासाठी देशातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून समस्यांवर चर्चा होते. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री, मंत्री व इतर लोकप्रतिनिधींना भेटून त्यांच्याकडे ज्येष्ठांचे प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.