शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

सागरीकिनारा ऑनलाइन जनसुनावणीस मनसेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 1:17 AM

संबंधित ग्रामपंचायतींना देणे गरजेचे असून घाई गडबडीत घेण्यात येणारी जनसुनावणी रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

बोईसर : सागरी किनारा आराखड्या-बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या ३० सप्टेंबरच्या आॅनलाईन जनसुनावणीस मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. जिल्ह्यातील जनता आराखड्याबाबत अनभिज्ञ आहे. याची माहिती संबंधित ग्रामपंचायतींना देणे गरजेचे असून घाई गडबडीत घेण्यात येणारी जनसुनावणी रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

मनसे विद्यार्थी सेनेचे पालघर जिल्हा लोकसभा अध्यक्ष धीरज गावड व मनसे पालघर उपजिल्हाध्यक्ष समीर मोरे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. पालघर जिल्हा आदिवासीबहुल असून येथील बहुसंख्य जनता मागास व अज्ञान आहे. त्यांना इंटरनेटबाबतीत काहीही माहिती नाही. ती समोर येऊन आपले म्हणणे मांडू शकते, पण ते मांडू नये म्हणून प्रशासनाने जाणूनबुजून हे षडयंत्र रचले आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असताना हा अट्टहास कशाला, हा स्थानिक भूमिपुत्र व सागरपुत्र यांच्यावर अन्याय असून त्यांची मालकी असलेल्या व वर्षानुवर्ष वापरत असलेल्या जागा उद्योगपतींसाठी देण्याकरिता का? असा प्रश्न उपस्थित करून जनसुनावणी त्वरित रद्द करून जनजीवन सुरळीत झाल्यानंतरच घेण्यात यावी, अन्यथा लोकहितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.