शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलली ठाण्याच्या शिवसैनिकांनी, प्रताप सरनाईकांची महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 1:30 AM

सत्तेची समीकरणे जुळत आली असताना अचानक झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना विश्वास दाखविणे महत्वाचे होते.

ठाणे : सत्तेची समीकरणे जुळत आली असताना अचानक झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना विश्वास दाखविणे महत्वाचे होते. यासाठी ठाण्यातील शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली होती. तर आमदार फुटू नयेत म्हणून त्यांच्या राहण्याची, हॉटेलची व्यवस्था, सुरक्षा, त्यांना कोण भेटायला येतो, कोणाला भेटू द्यायचे, कोणाला भेट देऊ नये, खाणे, पिणे या सर्वांची जबाबदारी मुंबईतील शिवसैनिकांबरोबरच ठाण्यातील शिवसैनिकांवरही होती. त्यांनी हे काम चोख बजावल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये महत्त्वाचे योगदान शिंदे, आव्हाड यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे.मागील आठवड्यात अचानक भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना आपल्या ताफ्यात घेऊन पहाटेच सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाआघाडीची गणितं फिसकटली होती. परंतु, येथेदेखील कुठेही न डगमगता, आमदारांना विश्वासात घेऊन या तीनही पक्षांनी रणनिती निश्चित केली. यामध्ये शिवसेनेवर मोठी जबाबदारी देण्यात आली होती. पळालेल्या आमदारांना शोधून आणण्यापासून त्यांची हॉटेलमधील व्यवस्था, राहणे, खाणे, पिणे आदींच्या व्यवस्था करण्याचे कामही शिवसेनेकडे सोपविण्यात आले होते.शिवसेनेने आपली ही भूमिका चोख पार पाडल्याचे दिसून आले आहे. एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरदेखील या तीनही पक्षांची जबाबदारी होती. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावरच महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. राष्टÑवादीच्या आमदारांना एका हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये नेणे, त्यांच्या राहण्याची, त्यांना काय हवे आहे, काय नको, या सर्वांची जबाबदार विहंग सरनाईक आणि त्यांच्या टीमवर होती. दुसरीकडे पूर्वेश सरनाईक यांच्यावर काँग्रेसच्या आमदारांची सोपविण्यात आली होती. त्यांच्याबरोबर वरुण सरदेसाई आणि युवा सेनेची कोअर कमिटी काम पाहत होती. ही मंडळी काँग्रेसच्या आमदारांना हॉटेलमधून, ने-आण करणे, राहण्याची इतर सोयीसुविधेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर शिवसेना आणि अपक्ष आमदारांच्या वास्तव्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.१५० जणांची टीम होती तैनातविशेष म्हणजे या तीनही पक्षांच्या सुरक्षेसाठी त्यांना कोण भेटायला येतो, कोणाला भेटण्यास सोडायचे कोणाला सोडू नये यासाठी मुंबई, ठाणे आणि मीरा भार्इंदरमधील शिवसेनेची १५० जणांची टीम काम पाहत होती.एकूणच एकही आमदार फुटू नये यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रत्येक जण जबाबदारी घेत असताना इतर मंडळीवरदेखील अशा प्रकारे महत्वाच्या जबाबदाºया सोपविण्यात आल्या होत्या.जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आगरी जेवणहॉटेलचे जेवण खाण्यापेक्षा शिवसेना आणि अपक्ष आमदारांसाठी रोज दुपार आणि रात्रीचे जेवण ठाण्यातूनच जात होते,अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये घोडबंदर भागातील आगरी कट्टा या हॉटेलमधून रोजच्या रोज घरगुती जेवण देण्याची जबाबादरी सरनाईक यांच्यावर सोपविण्यात आली होती.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMLAआमदारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019