शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 : 5 वर्षांच्या मुलाला विचारले तरी तो सांगेल कोण येणार?- फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 21:53 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार संजय केळकर यांच्यासाठी ठाण्यात प्रचारसभा घेतली आहे.

ठाणेः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार संजय केळकर यांच्यासाठी ठाण्यात प्रचारसभा घेतली आहे. यावेळी त्यांनी अनेक विकासाच्या मुद्द्यांना हात घातला आहे. 5 वर्षांच्या मुलाला देखील विचारले तरी तो सांगेल कोण येणार आहे, राहुल गांधी बँकॉकला फिरायला गेले कारण त्यांनाही माहिती आहे कोण येणार?, असं म्हणत त्यांनी आघाडीला टोला लगावला आहे. ठाण्यातल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. शरद पवार यांच्या पक्षाची अवस्था बिकट आहे. इकडे आड तर तिकडे विहीर आहे. आघाडीला समजलं त्यांच्या किती जागा निवडून येणार आहेत, त्यामुळेच सुशील कुमार यांनी एकत्र येण्याचं सल्ला दिल्याचा टोलाही फडणवीस यांनी हाणला आहे.मेट्रोचे जाळे पसरले आहे, संपूर्ण क्षेत्र मेट्रोच्या माध्यमातून तयार केली पाहिजेत. ठाण्यात हायब्रीडच्या माध्यमातूनदेखील इंटर मेट्रो आणू, असंही त्यांनी सांगितलं आहे. प्रदूषण दूर करण्यासाठी ठाणे ते बोरिवली रोपवे आणणार आहे. कोपरी उड्डाणपूल आठ पदरी करणार आहे. वाहतूक कोंडी दूर करणार आहे. टिकुजिनी वाडी ते बोरिवली या ठिकाणच्या बोगद्याचं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. अंतर्गत जल वाहतूक करण्यासाठी गडकरी यांनी मंजुरी दिली आहे, लवकरात लवकर ही सेवा सुरू होईल आणि वाहतूक कोंडी दूर होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

आज सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण हजारो कोटींची कामे करत आहोत, नागरिकांना दिलासा देण्याचे काम आपण करीत आहे. ज्या वेळी निधी लागला ते युतीच्या माध्यमातून देत आलो आहे. येत्या काळात ठाणेकरांसाठी क्लस्टरच्या योजना येणार आहेत. मोदीजींच्याकडून गरिबांना घरे देण्याचे काम युतीकडून होत आहे. गरिबांना एसआरएमधून 300 स्क्वेअर फूटची घरे देणार आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे अशा कॉरिडॉरचा प्रकल्प आणत आहे. 100 टक्के डंपिंग बंद करण्यात येणार असून, प्रदूषणमुक्त आणि चांगली कामे आपण हाती घेतली आहेत. पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींचे काम होणार आहे. गेल्या 5 वर्षात अनेक कामे केली असून,  14व्या क्रमांकावरून महाराष्ट्र 3 नंबरवर आणून ठेवला आहे. तसेच भविष्यात महाराष्ट्र एक नंबरवर येईल.  उद्योगात देशात पाहिले राज्य महाराष्ट्र आले आहे. परकीय गुंतवणुकीमध्ये देखील महाराष्ट्र पहिला आहे. देशातील एकूण 25% रोजगार महाराष्ट्रात आणले. या सरकारमध्ये कधीही घोटाळे झाले नाहीत. अजून चांगले काम आपल्याला करायचे आहे. मोदींच्या कार्यक्रमाला अमेरिकेत अनेक लोक उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक नेते असे मोदींना संबोधले आहे. भारत हे मजबूत राष्ट्र होत असल्याचं पाकिस्तानलाही समजले आहे. भारत आणि जम्मू काश्मीर बघितले, तर पाकिस्तान रोज कारवाया करत होता आणि मोदी यांनी 370 कलम आणून जम्मू काश्मीरमुक्त केले. भारताच्या जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा झेंडा फडकवला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019