शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

बिल्डरांमागे चौकशीचा ससेमिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 03:53 IST

२७ गावांतील घर नोंदणी : उपनिबंधकांची चौकशी राहिली बाजूला

कल्याण : केडीएमसी हद्दीतील २७ गावांतील घर नोंदणीप्रकरणी २५० बिल्डरांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पोलीस ठाण्यास चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार बिल्डरांना नोटिसा पाठवणे सुरु झाल्याची माहिती बिल्डर भास्कर पाटील यांनी दिली.

२७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीची बैठक मंगळवारी सायंकाळी मानपाडेश्वर मंदिरात झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, पदाधिकारी चंद्रकांत पाटील, अर्जुन चौधरी, बळीराम तरे, वकील शिवराम गायकर, वंडार पाटील, दत्ता वझे, गजानन मांगरुळकर आदी उपस्थित होते. यावेळी भास्कर पाटील बोलत होते.

२७ गावांतील घरांची नोंदणी सरकारने बंद केली आहे. मात्र, शहरी भागात नोंदणी सुरू आहे. ग्रामीण भागांतील २७ गावांतील बिल्डरांवर अन्याय का, यासाठी वर्षभरापासून बिल्डर पाठपुरावा करत आहेत. घर नोंदणी सुरू करण्याची मागणी संघर्ष समितीने केली होती. मात्र, त्याला दाद मिळत नाही. कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी, काही विशिष्ट बिल्डरांची घर नोंदणी उपनिबंधकांकडून केली जाते. याप्रकरणी उपनिबंधकांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु, त्यांच्या मागणीचा चुकीचा अर्थ घेत जिल्हाधिकाºयांनी उपनिबंधकांची चौकशी करण्याऐवजी घरांची नोंदणी करणाºया बिल्डरांनी काय कागदपत्रे सादर केली, याचीच चौकशी सुरू केली. त्याचा फटका २७ गावांतील बिल्डरांना बसला आहे. पोलिसांनी आतापर्यंत २९ बिल्डरांना नोटीस पाठवली असून त्यांच्याकडे कागदपत्रे काय सादर केली, याची तपासणी केली जाईल, असे त्यात म्हटले आहे. घरांची नोंदणी बंद झाली त्या दरम्यान २५० बिल्डरांनी नोंदणीचे काम केले होेते. ते सर्व चौकशीच्या फेºयात आले आहेत, अशी माहिती पाटील यांनी बैठकीत दिली. २७ गावांतील बिल्डरांनी बांधलेल्या इमारती बेकायदा आहेत. मग तेथे राहणाºयांची मते कशी काय अधिकृत असतील? तीदेखील बेकायदा ठरतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांची मते मागायला येऊ नये, असे आवाहन पाटील यांनी केली.भाल गावाचे नाव आरक्षित गाव ठेवाच्भाल गावात ५२३ हेक्टर जागा होती. त्यापैकी नेवाळी एरोड्रोमसाठी १३९ हेक्टर जागा बाधित झाली. वनखात्याची २५ हेक्टर आरक्षित आहे. गुरचरणसाठी १४ हेक्टर आहे. घनकचरा व्यवस्थापनसाठी २५० हेक्टर आरक्षित ठेवले आहे.च्हा आराखडा एमएमआरडीएने तयार केला. त्याला २०१४ मध्ये मंजुरी मिळाली. एरोड्रमसाठी नव्याने ७१ हेक्टर आरक्षित आहे. त्यामुळे गावाकडे आता केवळ २४ हेक्टरचा भूखंड शिल्लक आहे. भाल गाव हे आरक्षित गाव जाहीर करावे.च्भालचे नाव आरक्षित गाव असे ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. २५० हेक्टर जागेचे घनकचरा प्रकल्पाचे आरक्षण हटविण्यासाठी संघर्ष समितीने हा विषय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीHomeघर