शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
5
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
6
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
7
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
8
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
9
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
10
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
11
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
12
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
13
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
14
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
15
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
16
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
17
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
18
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
19
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
20
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाचे एकाच दिवसात दोनवेळा उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 00:10 IST

सकाळी ग्रामस्थांनी फोडला नारळ : संध्याकाळी खासदारांच्या हस्ते झाले औपचारिक उद्घाटन

भिवंडी : भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका उड्डाणपुलाचे सोमवारी एकाच दिवशी दोनदा उद्घाटन झाले. सकाळी संतप्त नागरिकांनी जय आगरी सेवा संस्थेचे अध्यक्ष यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारांवर नारळ फोडून उद्घाटन केले, तर सायंकाळी ५ वाजता भिवंडीचे खा. कपिल पाटील यांनी त्याच उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. सकाळीच या उड्डाणपुलाचे उद्घाटन झाल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने अधिकारी व भाजपच्या नेत्यांची पंचाईत झाली.

मुंबई-नाशिक बायपास भिवंडी-कल्याण महामार्गावरील रांजनोली चौकातील पुलाचे उद्घाटन उड्डाणपूल तयार होऊनही गेल्या महिनाभरापासून रखडले होते. निवडणुकीपूर्वी काम पूर्ण होऊनही, केवळ बड्या सत्ताधारी नेत्यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्याचा योग जुळून येत नसल्याने एमएमआरडीएने पूल वाहतुकीकरिता खुला केला नव्हता. त्यामुळे या महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या जैसे थे होती. भिवंडी पूर्व विधानसभेचे आ. रईस शेख यांच्यासह ग्रामस्थांनी हा उड्डाणपूल तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली होती. मात्र, त्याकडे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी शासकीय अधिकारी व पोलिसांना कोणतीही माहिती न देता रांजनोली उड्डाणपुलावर जाऊन नारळ फोडून उद्घाटन केल्याचे जाहीर केले. या अनौपचारिक उद्घाटनाची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केल्याने तालुक्यात खळबळ माजली. मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी-रांजनोली चौकात प्रवासी वाहतूककोंडीने हैराण आहेत. एमएमआरडीएने रांजनोली येथील हा उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, कंत्राटदाराच्या बेफिकिरी व संथगती कारभारामुळे काम वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे या परिसरात कित्येक महिने मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत होती. आता गेल्या महिनाभराहून अधिक काळ पुलाचे काम पूर्ण होऊनही तो बंद ठेवला होता. त्यामुळे वाहतूककोंडीत अडकणारे प्रवासी प्रशासनाच्या नावाने बोटं मोडत होते.उड्डाणपुलाच्या मागणीसाठी २०१३ पासून स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यामुळे हा उड्डाणपूल मंजूर झाला. मात्र, कोणत्याही एका नेत्याने या उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय घेऊ नये, यासाठी सोमवारी आम्ही या पुलाचे उद्घाटन केले आहे, अशी प्रतिक्रिया जय आगरी सेवा संस्थेचे अध्यक्ष यशवंत पाटील यांनी दिली. येथील नेत्यांना केवळ उद्घाटनाचे नारळ फोडायचीच माहिती आहे, अशी टीकाही पाटील यांनी खा. कपिल पाटील यांचा नामोल्लेख न करता केली.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे