शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

उड्डाणपुलाचे एकाच दिवसात दोनवेळा उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 12:10 AM

सकाळी ग्रामस्थांनी फोडला नारळ : संध्याकाळी खासदारांच्या हस्ते झाले औपचारिक उद्घाटन

भिवंडी : भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका उड्डाणपुलाचे सोमवारी एकाच दिवशी दोनदा उद्घाटन झाले. सकाळी संतप्त नागरिकांनी जय आगरी सेवा संस्थेचे अध्यक्ष यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारांवर नारळ फोडून उद्घाटन केले, तर सायंकाळी ५ वाजता भिवंडीचे खा. कपिल पाटील यांनी त्याच उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. सकाळीच या उड्डाणपुलाचे उद्घाटन झाल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने अधिकारी व भाजपच्या नेत्यांची पंचाईत झाली.

मुंबई-नाशिक बायपास भिवंडी-कल्याण महामार्गावरील रांजनोली चौकातील पुलाचे उद्घाटन उड्डाणपूल तयार होऊनही गेल्या महिनाभरापासून रखडले होते. निवडणुकीपूर्वी काम पूर्ण होऊनही, केवळ बड्या सत्ताधारी नेत्यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्याचा योग जुळून येत नसल्याने एमएमआरडीएने पूल वाहतुकीकरिता खुला केला नव्हता. त्यामुळे या महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या जैसे थे होती. भिवंडी पूर्व विधानसभेचे आ. रईस शेख यांच्यासह ग्रामस्थांनी हा उड्डाणपूल तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली होती. मात्र, त्याकडे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी शासकीय अधिकारी व पोलिसांना कोणतीही माहिती न देता रांजनोली उड्डाणपुलावर जाऊन नारळ फोडून उद्घाटन केल्याचे जाहीर केले. या अनौपचारिक उद्घाटनाची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केल्याने तालुक्यात खळबळ माजली. मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी-रांजनोली चौकात प्रवासी वाहतूककोंडीने हैराण आहेत. एमएमआरडीएने रांजनोली येथील हा उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, कंत्राटदाराच्या बेफिकिरी व संथगती कारभारामुळे काम वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे या परिसरात कित्येक महिने मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत होती. आता गेल्या महिनाभराहून अधिक काळ पुलाचे काम पूर्ण होऊनही तो बंद ठेवला होता. त्यामुळे वाहतूककोंडीत अडकणारे प्रवासी प्रशासनाच्या नावाने बोटं मोडत होते.उड्डाणपुलाच्या मागणीसाठी २०१३ पासून स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यामुळे हा उड्डाणपूल मंजूर झाला. मात्र, कोणत्याही एका नेत्याने या उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय घेऊ नये, यासाठी सोमवारी आम्ही या पुलाचे उद्घाटन केले आहे, अशी प्रतिक्रिया जय आगरी सेवा संस्थेचे अध्यक्ष यशवंत पाटील यांनी दिली. येथील नेत्यांना केवळ उद्घाटनाचे नारळ फोडायचीच माहिती आहे, अशी टीकाही पाटील यांनी खा. कपिल पाटील यांचा नामोल्लेख न करता केली.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे