शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात आचारसंहिता भरारी पथकातील ५ जणांवर खंडणीचा गुन्ह्यानंतर निलंबनाची कारवाई

By सदानंद नाईक | Updated: November 10, 2024 17:42 IST

यामध्ये दोन पोलिसांचा समावेश, बडतर्फेची होणार कारवाई, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे संकेत

सदानंद नाईक

उल्हासनगर : उल्हासनगर आचारसंहिता भरारी पथकाने चेक पोस्टच्या तपासणीत जप्त केलेल्या रक्कमच्या प्रकरणी कोणतीही कारवाई न करता, ८५ हजाराची अपरातपर केल्याचा प्रकार उघड झाला. तब्बल १३ दिवसांनी पथकाच्या ५ कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात आले. तसेच त्याच्यावर बडतर्फेची कारवाईचे संकेत निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली.

 उल्हासनगर निवडणूक आचारसंहिता पथक क्रं-६ च्या कर्मचाऱ्यांनी २८ ऑक्टोबर रोजी पहाटे फुल उत्पादक व्यापारी बबन आमले व त्यांचे मित्र नितीन शिंदे हे कल्याणवरून अहमदनगर व पुणे येथील शेतकऱ्यांना फुल उत्पादनाच्या विक्रीचे पैसे देण्यासाठी जात होते. म्हारळ चौकी जवळ त्यांची गाडी अडवून तपासणी केली. तपासणीत त्यांच्याकडे ७ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम सापडली. यानंतर पथकप्रमुखांनी आमले आणि शिंदे यांना गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविल्यावर, त्यांनी पैश्याच्या पावत्या दाखवून पैसे वैध असल्याचे स्पष्ट केले. तरीही त्यांनी जप्त केलेल्या रक्कमे पैकी ८५ हजार रुपये कोणतीही कारवाई न करता उकळण्यात आले. याप्रकरणी आमले व शिंदे यांनी तक्रार करूनही सदर प्रकार उघडकीस यायला १३ दिवस लागले. 

उल्हासनगर मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद व पोलीस अधिकाऱ्यांकडे मीडियाच्या माध्यमानी विचारणा केल्यानंतर, कारवाई सुरू झाली. अखेर उल्हासनगर महापालिकेचे सहायक आयुक्त आणि विधानसभेचे आचारसंहिता पथक प्रमुख सुनिल लोंढे यांच्या फिर्यादीवरून पथकातील पाच जणांविरुद्ध खंडणी आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले. ५ पैकी ३ कर्मचारी महापालिकेचे असून २ कर्मचारी पोलीस आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी पथकातील दोषी पाचही कर्मचाऱ्यावर बडतर्फ करण्याची कारवाई सुरु असल्याचे संकेत दिले. 

निवडणूक आचारसंहिता पाथकाने केलेल्या प्रत्येक कारवाईचे तपासणीचे चित्रीकरण करणे अनिवार्य आहे. मात्र या घटनेचे चित्रीकरण करण्यात आले नसून पोलिसांनी या कृत्यावर पडदा टाकला असल्याचे उघड झाले. अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांच्यावर बडतर्फ कारवाई योग्य असल्याचे शर्मा यांचे म्हणणे आहे.