शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: December 27, 2016 02:51 IST

पावसाळा संपून अवघे दोनच महिने उलटले असतानाच उल्हासनगरातील पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले आहे. जवळपास तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहत असून

उल्हासनगर : पावसाळा संपून अवघे दोनच महिने उलटले असतानाच उल्हासनगरातील पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले आहे. जवळपास तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहत असून उरलेले दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सध्या सात टक्के पाणीकपात लागू असताना ही स्थिती असताना पाटबंधारे विभागाने सुचवल्यानुसार जर २० टक्के पाणीकपात लागू झाली, तर हाहाकार माजण्याची भीती आहे. नागरिकांवर सध्या बोअरवेलचे दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. उल्हासनगर पालिकेकडे पाण्याचा स्वत:चा स्रोत नसल्याने पुरवठ्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. अपुऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल नगरसेवक एमआयडीसीला जबाबदार धरत आहेत, तर लोकसंख्येच्या गरजेच्या दुप्पट पाणीपुरवठा होऊनही जर नागरिकांना तीनच दिवस पाणी मिळत असेल, तर उरलेले अतिरिक्त पाणी जाते कुठे, असा प्रश्न आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना पडला आहे. त्यांनी शहराचा दौरा करून पाणीचोरी व गळतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अवैध नळजोडणी तोडण्याचे आदेश देऊनही हाती काहीच लागलेले नाही. गळती थांबवून मुबलक पाण्यासाठी ३०० कोटींची योजना राबवली. तीही ठप्प आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने पाण्याच्या टाक्यांवर कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्याची वेळ पालिकेवर आली होती. टंचाईची झळ कमी करण्यासाठी पालिकेने भूगर्भीय सर्वेक्षण न करताच हातपंप व बोअरवेल खोदण्याचा सपाटा लावला. महिनाभरात २०० पेक्षा जास्त बोअरवेल व हातपंपाला पालिकेने मंजुरी दिली. त्यावर, चार कोटींचा खर्च केला. त्यातील अर्ध्याअधिक बोअरवेल दुरुस्ती व पाण्याविना कोरड्याठाक आहेत. सध्या धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही आठवड्यातून चार दिवस अपुरे पाणी मिळत असल्याने हातपंपाचे दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याची माहिती शिवसेनेचे गटनेते सुभाष मनसुलकर यांनी दिली. (प्रतिनिधी) पूर्व-पश्चिम पाणीयुद्ध पेटणारपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पाण्याच्या प्रश्नाने राजकीय रंग घेतला आहे. शहराच्या पूर्वेला एमआयडीसीच्या जांभूळ व पाले जलसाठ्यातून ३७, तर पश्चिम बाजूला शहाड गावठाण जलसाठ्यातून ८८ एमएलडी पाणीपुरवठा होतो.पूर्वेला आठवड्यातून चार दिवस अपुरे व कमी दाबाने पाणी मिळते. पूर्व-पश्चिम भागात असमान पाणी वितरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून पूर्वेपेक्षा पश्चिमेला जादा पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ रविवारी नगरसेवक विजय पाटील यांनी रास्ता रोको केला. शिवसेनेचे गटनेते सुभाष मनसुलकर यांनी ३० डिसेंबरला शिवसेनेचे काही नगरसेवक पाण्यासाठी उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली. कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून त्यांच्यामुळे पाणीयोजना अडल्याचा आरोप यापूर्वी महासभेत झाला आहे. सेलवन हटाव, शहर बचाव, अशी मोहीम उघडण्यात आली होती. त्यांच्या हकालपट्टी व चौकशीची मागणी झाली होती. गेल्या उन्हाळ्यात हातपंप-बोअरवेल खोदण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी केला आहे.