शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

भिवंडीचे भविष्यात मेळघाट होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 10:58 PM

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडीत कुपोषणाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने सरकारच्या कुपोषण निर्मूलनाबाबतच्या योजना केवळ कागदावरच असल्याचे दिसत आहे.

- नितीन पंडित, भिवंडीएका बाजूला भारत विविध क्षेत्रात प्रगती करत असला तरी दुसऱ्या बाजूला खास करून ग्रामीण भागात कुपोषित बालके आढळून येत आहेत. भिवंडीसारख्या परिसरात अशी बालके आढळल्याने हा चिंतेचा विषय आहे. सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे, हेही नाकारून चालणार नाही.मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडीत कुपोषणाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने सरकारच्या कुपोषण निर्मूलनाबाबतच्या योजना केवळ कागदावरच असल्याचे दिसत आहे. कुपोषणामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या एका तीन वर्षीय मुलीमुळे हे वास्तव समोर आले आहे. भिवंडी तालुक्यातील दाभाड व चावे येथील वीटभट्टीवर काम करणाºया मजुराच्या मुलीस श्रमजीवी संघटनेने रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते . भूमिका शनवार वय तीन वर्षे असे कुपोषित बालिकेचे नाव असून तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी ठाण्यात दाखल केले आहे.मूळ पालघर जिल्ह्यातील शिसने येथील विलास मागील एक महिन्यापासून भिवंडी तालुक्यातील दाभाड येथील वीट भट्टीवर मजुरीचे काम करत आहेत. श्रमजीवी संघटनेच्या गावपातळीवर बैठका सुरू असून त्यासाठी तालुक्यातील कार्यकर्ते ग्रामीण भागात फिरत असताना दाभाड येथे सुरेखा ही महिला आढळली. तिच्याकडे मुलीबाबत चौकशी केली असता ती आजारी असल्याचे समजल्याने कार्यकर्ती आशा भोईर यांना या मुलीच्या कुपोषणाचा अंदाज आल्याने त्यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन गेल्या. तेथे मुलीचे वजन अवघे सहा किलो भरले. मुलगी अतितीव्र कुपोषित असल्याचे निदर्शनास आल्याने तिला रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तालुक्यातील चावे गावातील अंगणवाडीतही सात कुपोषित बालके आढळली. वीटभट्टीवर मजुरी करणाºया मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत असल्याचे निदर्शनास आले. एकीकडे सरकार कुपोषित बालकांसाठी योजना राबवत असते. परंतु खºया अर्थाने सरकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ वीटभट्टीवर काम करणाºया कामगारांपर्यंत पोहचतच नसल्याची धक्कादायक कबुली या पालकांनी दिली.वीटभट्टीवर भिवंडीतील आदिवासी पाड्यांबरोबरच शहापूर , मुरबाड , जव्हार, मोखाडा तालुक्यातील आदिवासी कामगार म्हणून काम करतात. विशेष म्हणजे दिवसरात्र या मजुरांना वीटभट्टी मालकांकडून राबविले जाते, मात्र त्यातून त्यांना दिली जाणारी मजुरी तुंटपुजी असल्याने मेहनत करूनही या वीटभट्टी कामगारांना नेहमीच आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. अनेकवेळा या मजुरांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही. वीटभट्टीवर सहज फेरफटका मारला तर ही बाब निश्चितच निदर्शनास आल्याशिवाय राहत नाही. तर पोटाच्या खळगीबरोबरच या मजुरांच्या मुलांना खावटीबरोबरच शिक्षणापासूनही वंचित राहण्याची वेळ आली आहे.सरकार धोरण ठरविते मात्र त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही हीच खरी शोकांतिका आहे. मजुरी करूनही पुरेसे अन्न मिळत नसल्याने अनेक वीटभट्टी मजूर स्वत: उपाशी राहून आपल्या ताटातील अन्न आपल्या मुलांना देतात. कधी कधी तर या चिमुकल्यांच्या ताटात फक्त भात तर कधी त्यांनाही उपाशी पोटीच झोपावे लागत असल्याने या मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. बालविवाह हेही त्यामागे एक कारण आहे.अंगणवाडी सेविकांनाच करावा लागतो खर्चभिवंडीतील केवळ दोन ते चार आदिवासी पाड्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात १० ते १२ कुपोषित बालके आढळली. अंगणवाडी सेविकांनी सांगितले कि सरकार कुपोषित बालकांसाठी विविध योजना राबवतात.मुलांसाठी मिळणारा उपयुक्त आहार वेळेवर मिळत नसल्याने स्वत: खर्च करून मुलांसाठी आहार आणावा लागतो. परंतु अंगणवाडीच्या सेविकेला चार-चार महिने पगार दिला जात नाही मग हा खर्च आम्ही कधी पर्यंत करणार?वेळेवर आहार मिळत नसल्याने मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढत असून मुलांची उंची व वजनात घट होते.

टॅग्स :Melghatमेळघाटbhiwandiभिवंडी