शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 05:38 IST

मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी परवानगी नाकारत अनेकांना धरपकड करून डांबले, रस्तेही बंद, तरी निघाला मोर्चा; मंत्री सरनाईकांवर भिरकावली पाण्याची बाटली

मीरा रोड : मराठी भाषेचा अवमान आणि मराठी लोकांना अद्दल घडवण्याची व्यापाऱ्यांनी केलेली कथित वक्तव्ये याविरोधात मंगळवारी मीरा रोड येथे संतप्त मराठी भाषकांनी पोलिसांचा विरोध मोडून मोर्चा काढला. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनसेच्या नेत्यांनी मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी सोमवारी रात्री अनेक नेत्या-कार्यकर्त्यांची धरपकड केली. मोठा पोलिस फौजफाटा तैनात असतानाही त्याला न जुमानता शेकडो मराठी भाषिक रस्त्यावर उतरले. मनसेसह उद्धवसेना, शिंदेसेना, काँग्रेस, मराठी एकीकरण समिती, सकल मराठा समाज, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट यांच्यासह अनेक संस्थांचे कार्यकर्ते-प्रतिनिधी मोर्चात सामील झाले होते.

मीरा रोडच्या मिठाई दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी कारवाई सुरू केली असतानाच व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला आणि त्यात मराठी भाषा आणि माणसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली. त्याविरोधात विविध मराठी भाषक संस्था-संघटना, राजकीय पक्षांनी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

निवडलेल्या मार्गामुळे संघर्षाची शक्यता होती : मुख्यमंत्री

मनसेने मोर्चासाठी निवडलेल्या मार्गामुळे संघर्षाची शक्यता होती. कायदा आणि सुव्यवस्था राखणे पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, त्यामुळे त्यांनी मोर्चाला परवानगी नाकारली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते जाणीवपूर्वक असा मार्ग मागत होते, ज्यातून संघर्ष होईल. त्यावेळी पोलिसांनी नेहमीचा मार्ग मोर्चासाठी घ्या, असे सांगितले. त्यांनी या गोष्टीला नकार दिला. हाच मार्ग घेणार यावर ते ठाम होते, असेही ते म्हणाले.

निशिकांत दुबे यांच्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, खासदार दुबे यांचे वक्तव्य जर तुम्ही पूर्ण ऐकले तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत. मराठी माणसांबाबत त्यांनी सरसकट वक्तव्य केलेले नाही. मात्र, तरीही माझे मत असे आहे की अशा प्रकारचे बोलणे योग्य नाही. कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. मी पुन्हा सांगतो की मराठी माणसांचे योगदान महाराष्ट्रात प्रचंड मोठे आहे.

जमावापुढे पोलिसांचे बळही ठरले दुबळे

एक मोठा जमाव मोर्चाने आल्यानंतर पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. काहींना पकडून बसमध्ये कोंबले, तर काहींना मागे रेटले. मात्र, दुपारी १२:१०च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आणि भगवे झेंडे घेतलेला आणखी एक जमाव आला. त्याने पोलिसांचा बंदोबस्त धुडकावून मोर्चा काढला. पोलिसांनीही जमावाचा संताप पाहून त्यांना अडवण्याचा प्रयत्न सोडून दिला.

कोणाच्या आदेशावरून धरपकड? : नेमका मराठी माणसाचा मोर्चा निघत असताना पोलिसांनी धरपकड का करावी? कोणाच्या आदेशावरून केली, याचे उत्तर गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राला देण्याची गरज आहे, असे उद्धव सेनेचे आदित्य ठाकरे म्हणाले.

पोलिसांनी रस्ते केले बंद - पोलिसांनी मनसे, शिंदेसेना, उद्धवसेना आणि मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी रात्री घरात घुसून धरपकड केली. त्यांना रात्रभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. तसेच मोर्चाच्या ठिकाणी लोक येऊ नयेत, म्हणून पोलिसांनी रस्तेही बंद केले होते. मंगळवारी सकाळपासून मोर्चासाठी येणाऱ्यांना पोलिस ताब्यात घेत होते.

अवघ्या १० मिनिटांत मंत्र्यांचा काढता पायपरिवहनमंत्री प्रताप सरनाईक मोर्चात सामील होण्यासाठी शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह आले असता मनसे आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. सरनाईक यांच्या दिशेने जमावातून  पाण्याची बाटलीही भिरकावण्यात आली. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत सरनाईक  निघून गेले. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ही घटना योग्य नव्हती, असे म्हटले. सरनाईक यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला. पोलिसांनी व्यापाऱ्यांना मोर्चा काढू दिला, तसा मराठी माणसांनाही काढू द्यायला हवा होता; परंतु पोलिसांनी दबावतंत्र वापरले व वातावरण चिघळले. 

टॅग्स :marathiमराठीMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे