शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 05:38 IST

मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी परवानगी नाकारत अनेकांना धरपकड करून डांबले, रस्तेही बंद, तरी निघाला मोर्चा; मंत्री सरनाईकांवर भिरकावली पाण्याची बाटली

मीरा रोड : मराठी भाषेचा अवमान आणि मराठी लोकांना अद्दल घडवण्याची व्यापाऱ्यांनी केलेली कथित वक्तव्ये याविरोधात मंगळवारी मीरा रोड येथे संतप्त मराठी भाषकांनी पोलिसांचा विरोध मोडून मोर्चा काढला. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनसेच्या नेत्यांनी मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी सोमवारी रात्री अनेक नेत्या-कार्यकर्त्यांची धरपकड केली. मोठा पोलिस फौजफाटा तैनात असतानाही त्याला न जुमानता शेकडो मराठी भाषिक रस्त्यावर उतरले. मनसेसह उद्धवसेना, शिंदेसेना, काँग्रेस, मराठी एकीकरण समिती, सकल मराठा समाज, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट यांच्यासह अनेक संस्थांचे कार्यकर्ते-प्रतिनिधी मोर्चात सामील झाले होते.

मीरा रोडच्या मिठाई दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी कारवाई सुरू केली असतानाच व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला आणि त्यात मराठी भाषा आणि माणसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली. त्याविरोधात विविध मराठी भाषक संस्था-संघटना, राजकीय पक्षांनी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

निवडलेल्या मार्गामुळे संघर्षाची शक्यता होती : मुख्यमंत्री

मनसेने मोर्चासाठी निवडलेल्या मार्गामुळे संघर्षाची शक्यता होती. कायदा आणि सुव्यवस्था राखणे पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, त्यामुळे त्यांनी मोर्चाला परवानगी नाकारली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते जाणीवपूर्वक असा मार्ग मागत होते, ज्यातून संघर्ष होईल. त्यावेळी पोलिसांनी नेहमीचा मार्ग मोर्चासाठी घ्या, असे सांगितले. त्यांनी या गोष्टीला नकार दिला. हाच मार्ग घेणार यावर ते ठाम होते, असेही ते म्हणाले.

निशिकांत दुबे यांच्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, खासदार दुबे यांचे वक्तव्य जर तुम्ही पूर्ण ऐकले तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत. मराठी माणसांबाबत त्यांनी सरसकट वक्तव्य केलेले नाही. मात्र, तरीही माझे मत असे आहे की अशा प्रकारचे बोलणे योग्य नाही. कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. मी पुन्हा सांगतो की मराठी माणसांचे योगदान महाराष्ट्रात प्रचंड मोठे आहे.

जमावापुढे पोलिसांचे बळही ठरले दुबळे

एक मोठा जमाव मोर्चाने आल्यानंतर पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. काहींना पकडून बसमध्ये कोंबले, तर काहींना मागे रेटले. मात्र, दुपारी १२:१०च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आणि भगवे झेंडे घेतलेला आणखी एक जमाव आला. त्याने पोलिसांचा बंदोबस्त धुडकावून मोर्चा काढला. पोलिसांनीही जमावाचा संताप पाहून त्यांना अडवण्याचा प्रयत्न सोडून दिला.

कोणाच्या आदेशावरून धरपकड? : नेमका मराठी माणसाचा मोर्चा निघत असताना पोलिसांनी धरपकड का करावी? कोणाच्या आदेशावरून केली, याचे उत्तर गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राला देण्याची गरज आहे, असे उद्धव सेनेचे आदित्य ठाकरे म्हणाले.

पोलिसांनी रस्ते केले बंद - पोलिसांनी मनसे, शिंदेसेना, उद्धवसेना आणि मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी रात्री घरात घुसून धरपकड केली. त्यांना रात्रभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. तसेच मोर्चाच्या ठिकाणी लोक येऊ नयेत, म्हणून पोलिसांनी रस्तेही बंद केले होते. मंगळवारी सकाळपासून मोर्चासाठी येणाऱ्यांना पोलिस ताब्यात घेत होते.

अवघ्या १० मिनिटांत मंत्र्यांचा काढता पायपरिवहनमंत्री प्रताप सरनाईक मोर्चात सामील होण्यासाठी शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह आले असता मनसे आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. सरनाईक यांच्या दिशेने जमावातून  पाण्याची बाटलीही भिरकावण्यात आली. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत सरनाईक  निघून गेले. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ही घटना योग्य नव्हती, असे म्हटले. सरनाईक यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला. पोलिसांनी व्यापाऱ्यांना मोर्चा काढू दिला, तसा मराठी माणसांनाही काढू द्यायला हवा होता; परंतु पोलिसांनी दबावतंत्र वापरले व वातावरण चिघळले. 

टॅग्स :marathiमराठीMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे