शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
2
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
3
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
4
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
5
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
6
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
7
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
8
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
9
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
10
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
11
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
12
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
13
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
14
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
15
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
16
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
17
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
18
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
19
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
20
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 05:38 IST

मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी परवानगी नाकारत अनेकांना धरपकड करून डांबले, रस्तेही बंद, तरी निघाला मोर्चा; मंत्री सरनाईकांवर भिरकावली पाण्याची बाटली

मीरा रोड : मराठी भाषेचा अवमान आणि मराठी लोकांना अद्दल घडवण्याची व्यापाऱ्यांनी केलेली कथित वक्तव्ये याविरोधात मंगळवारी मीरा रोड येथे संतप्त मराठी भाषकांनी पोलिसांचा विरोध मोडून मोर्चा काढला. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनसेच्या नेत्यांनी मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी सोमवारी रात्री अनेक नेत्या-कार्यकर्त्यांची धरपकड केली. मोठा पोलिस फौजफाटा तैनात असतानाही त्याला न जुमानता शेकडो मराठी भाषिक रस्त्यावर उतरले. मनसेसह उद्धवसेना, शिंदेसेना, काँग्रेस, मराठी एकीकरण समिती, सकल मराठा समाज, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट यांच्यासह अनेक संस्थांचे कार्यकर्ते-प्रतिनिधी मोर्चात सामील झाले होते.

मीरा रोडच्या मिठाई दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी कारवाई सुरू केली असतानाच व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला आणि त्यात मराठी भाषा आणि माणसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली. त्याविरोधात विविध मराठी भाषक संस्था-संघटना, राजकीय पक्षांनी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

निवडलेल्या मार्गामुळे संघर्षाची शक्यता होती : मुख्यमंत्री

मनसेने मोर्चासाठी निवडलेल्या मार्गामुळे संघर्षाची शक्यता होती. कायदा आणि सुव्यवस्था राखणे पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, त्यामुळे त्यांनी मोर्चाला परवानगी नाकारली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते जाणीवपूर्वक असा मार्ग मागत होते, ज्यातून संघर्ष होईल. त्यावेळी पोलिसांनी नेहमीचा मार्ग मोर्चासाठी घ्या, असे सांगितले. त्यांनी या गोष्टीला नकार दिला. हाच मार्ग घेणार यावर ते ठाम होते, असेही ते म्हणाले.

निशिकांत दुबे यांच्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, खासदार दुबे यांचे वक्तव्य जर तुम्ही पूर्ण ऐकले तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत. मराठी माणसांबाबत त्यांनी सरसकट वक्तव्य केलेले नाही. मात्र, तरीही माझे मत असे आहे की अशा प्रकारचे बोलणे योग्य नाही. कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. मी पुन्हा सांगतो की मराठी माणसांचे योगदान महाराष्ट्रात प्रचंड मोठे आहे.

जमावापुढे पोलिसांचे बळही ठरले दुबळे

एक मोठा जमाव मोर्चाने आल्यानंतर पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. काहींना पकडून बसमध्ये कोंबले, तर काहींना मागे रेटले. मात्र, दुपारी १२:१०च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आणि भगवे झेंडे घेतलेला आणखी एक जमाव आला. त्याने पोलिसांचा बंदोबस्त धुडकावून मोर्चा काढला. पोलिसांनीही जमावाचा संताप पाहून त्यांना अडवण्याचा प्रयत्न सोडून दिला.

कोणाच्या आदेशावरून धरपकड? : नेमका मराठी माणसाचा मोर्चा निघत असताना पोलिसांनी धरपकड का करावी? कोणाच्या आदेशावरून केली, याचे उत्तर गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राला देण्याची गरज आहे, असे उद्धव सेनेचे आदित्य ठाकरे म्हणाले.

पोलिसांनी रस्ते केले बंद - पोलिसांनी मनसे, शिंदेसेना, उद्धवसेना आणि मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी रात्री घरात घुसून धरपकड केली. त्यांना रात्रभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. तसेच मोर्चाच्या ठिकाणी लोक येऊ नयेत, म्हणून पोलिसांनी रस्तेही बंद केले होते. मंगळवारी सकाळपासून मोर्चासाठी येणाऱ्यांना पोलिस ताब्यात घेत होते.

अवघ्या १० मिनिटांत मंत्र्यांचा काढता पायपरिवहनमंत्री प्रताप सरनाईक मोर्चात सामील होण्यासाठी शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह आले असता मनसे आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. सरनाईक यांच्या दिशेने जमावातून  पाण्याची बाटलीही भिरकावण्यात आली. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत सरनाईक  निघून गेले. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ही घटना योग्य नव्हती, असे म्हटले. सरनाईक यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला. पोलिसांनी व्यापाऱ्यांना मोर्चा काढू दिला, तसा मराठी माणसांनाही काढू द्यायला हवा होता; परंतु पोलिसांनी दबावतंत्र वापरले व वातावरण चिघळले. 

टॅग्स :marathiमराठीMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे