शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

श्रमजीवींचा हक्कांसाठी एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:51 AM

निवासी जागा, वनपट्ट्यांविषयी प्रशासनाला विचारला जाब

ठाणे : स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांनंतरही आदिवासींना अजूनही त्यांचे मूलभूत हक्क मिळालेले नाही. त्यांच्या या विविध समस्यांसह वनहक्क मिळवून देण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या मागण्यांसाठी श्रमजीवींनी मंगळवारी निर्धार मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून प्रशासनाला धारेवर धरून जाब विचारला. मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूककोंडी झाली होती.माजी आमदार व श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आदिवासींनी या निर्धार मोर्चात सहभाग घेतला होता. साकेत मैदानावर एकत्र आल्यानंतर या श्रमजिवींनी धडक मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयास धडक दिली. येथील शासकीय विश्रामगृहासमोरीलरस्त्यावर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या मोर्चातील कार्यकर्ते येथील मध्यवर्ती कारागृहापर्यंत पसरले होते. यामुळे वाहतूककोंडीलादेखील ठाणेकरांना तोंड द्यावे लागले.वन हक्क मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसह गावठाण विस्तार व गावठाण निर्मितीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेणे, शासकीय व खाजगी घराखाालील जागा नावे करणे, जातीच्या दाखल्यासाठी पन्नास वर्षांची जाचक अट रद्द करणे, प्रत्येक आदिवासी व गरीब कुटुंबांना अंत्योदय योजनेचा लाभ घेणे, आदिम म्हणजे कातकरी जमातीच्या कुटुंबीयाचे उत्थान करून वस्तीचा विकास करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.