शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Cyclone Nisarga: चक्रीवादळाने मीरा-भाईंदरच्या मच्छीमारांचं नुकसान; दिशा बदलल्यानं धोका टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 8:37 PM

Cyclone Nisarga: वादळी वारे व पावसामुळे शहरात 10 ठिकाणी झाडं पडल्याच्या तर भाईंदर पोलीस ठाणे बाहेरील मंडप शेड पडल्याची घटना घडली.

मीरा रोडः निसर्ग या चक्रीवादळाने दिशा बदलल्याने भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक या समुद्र किना-यावरील गावांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु वादळाच्या शक्यतेने बोटी व त्यातील साहित्य सुखरुप ठेवण्यासाठी मच्छीमारांची मोठी तारांबळ उडाली. सुकवत ठेवलेली मासळी भिजून नुकसान  झाले. प्रशासनाने खबरदारी म्हणून काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. वादळी वारे व पावसामुळे शहरात 10 ठिकाणी झाडं पडल्याच्या तर भाईंदर पोलीस ठाणे बाहेरील मंडप शेड पडल्याची घटना घडली.चक्रीवादळ येण्याच्या शक्यतेने समुद्र किनारी एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले होते. या शिवाय अग्निशमन दल, पोलीस व तटरक्षक दलसुद्धा सज्ज होते. उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख, मंडळ अधिकारी दिपक अनारे, तलाठी तर उपअधीक्षक शशिकांत भोसले, सहय्यक निरीक्षक सतीश निकमसह पोलीस व एनडीआरएफच्या जवानांनी कोळीवाड्यांमध्ये फिरून परिस्थतीचा आढावा घेतला. आयुक्त चंद्रकांत डांगे देखील पालिका अधिकारायांसह दुपारनंतर उत्तनला पोहोचले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून सातत्याने आढावा घेतला जात होता तसेच आवश्यक सूचना ते करत होते.  महसूल, पोलीस व पालिका प्रशासाने मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, स्थानिक नगरसेवक शर्मिला गंडोली, हेलन गोविंद, एलायस बांडय़ा तसेच चर्चच्या धर्मगुरुंसोबत फिरून किना-यावर राहणा-या मच्छीमारांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले. संत जोसेफ शाळा व वेलंकनी चर्च येथे लोकांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी मच्छीमारांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांनी भुतोडी बंदर भागातील समुद्रालगतची काही घरं रिकामी करायला घेतली होती. त्यांना नजीकच्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. पालिकेने 5 बस लोकांना नेण्यासाठी तैनात केल्या होत्या. शिवाय रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्यांना सतर्क राहण्यास सांगितले होते.

अनेक मच्छीमारांच्या बोटी समुद्रातच होत्या. वारा - पाऊस त्यातच वादळाचा धोका या मुळे मच्छीमारांनी आपल्या बोटी किना-यावर घेण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले. क्रेनच्या सहाय्याने तसेच गरज असेल तिकडे मच्छीमारांनी दोरखंडाने बोटी ओढून किना-यास आणल्या. बोटींमधील जाळी व अन्य सामान काढण्यासह बोटींची बाहेरुन सफाई करण्याचे काम लगबगीने केले जात होते. त्सुनामी वेळी देखील उत्तन समुद्र किना-यास फटका बसलेला नसल्याने चक्रीवादळाबाबत देखील अनेक मच्छीमार फारसे गंभीर दिसत  नव्हते. परंतु अनेक घरांमध्ये चक्रीवादळाचे संकट टळू दे अशी प्रार्थना केली गेली. वादळी वा-यामुळे पत्रे उडून कोणी जखमी वा जीवितहानी होऊ याची भीती होती. सुदैवाने तशी घटना घडली नाही.

दरम्यान, वादळी वारा व पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या 10 घडना घडल्या. सृष्टी, पेणकरपाडा, उत्तन, काशीगाव, आंबेडकर नगर, नवघरचे रवीकिरण आदी भागात झाडं पडली. नवघरच्या साईचरण इमारत भागात झाड पडल्याने एका वाहनाचे नुकसान झाले. तर भाईंदर पोलीस ठाण्या समोर रस्त्यावर उभारलेली तपासणी शेड खालुन जाणाराया वाहनांवर पडली. परंतु यात नुकसान असे झाले नाही असे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे म्हणाले.  

टॅग्स :cycloneचक्रीवादळCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ