शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Coronavirus : दहावी, बारावीच्या परीक्षा त्वरित स्थगित करा, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 00:49 IST

राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील, असे परिपत्रक काढले आहे. या परीक्षा घेण्यासाठी अट्टाहास का?

डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे एक आव्हान असून, त्यासाठी सरकारी यंत्रणा विविध आघाड्यांवर प्रयत्न करत आहेत. मात्र, राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील, असे परिपत्रक काढले आहे. या परीक्षा घेण्यासाठी अट्टाहास का? सरकारने गांभीर्य लक्षात घेऊन या परीक्षा त्वरित स्थगित कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ठाण्याच्या अध्यक्षा हेमलता मुनोत यांनी मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री व ठाण्यातील शिक्षणाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.सरकारने धार्मिक, सामाजिक, निवडणूक, विद्यापीठातील परीक्षा आदी कार्यक्रम रद्द केले आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी १४४ कलम लागू केले आहे. यावरूनच या साथीची गांभीर्यता लक्षात येते. मात्र, सरकार दहावी, बारावीच्या परीक्षा स्थगित करत नसल्याचे दिसून येत आहे. या परीक्षा २३ मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत. परीक्षेच्या कामात लाखो शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षा मंडळ, असे मनुष्यबळ कार्यरत असते. केंद्रावर शेकडो विद्यार्थी एकत्र येऊन परीक्षा देतात. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने सर्वांच्याच जीवाला धोका आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन दहावी-बारावीच्या परीक्षा त्वरित स्थगित कराव्यात. विद्यार्थ्यांपासून परीक्षा मंडळापर्यंत प्रत्येक घटकांची जबाबदारी राज्य सरकार घेईल का?, असा सवालही परिषदेने केला आहे. परीक्षा त्वरित स्थगित कराव्यात, सर्व शाळांना सुटी घोषित करावी व त्याचे पालन करण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र