शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

Coronavirus : दहावी, बारावीच्या परीक्षा त्वरित स्थगित करा, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 00:49 IST

राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील, असे परिपत्रक काढले आहे. या परीक्षा घेण्यासाठी अट्टाहास का?

डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे एक आव्हान असून, त्यासाठी सरकारी यंत्रणा विविध आघाड्यांवर प्रयत्न करत आहेत. मात्र, राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील, असे परिपत्रक काढले आहे. या परीक्षा घेण्यासाठी अट्टाहास का? सरकारने गांभीर्य लक्षात घेऊन या परीक्षा त्वरित स्थगित कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ठाण्याच्या अध्यक्षा हेमलता मुनोत यांनी मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री व ठाण्यातील शिक्षणाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.सरकारने धार्मिक, सामाजिक, निवडणूक, विद्यापीठातील परीक्षा आदी कार्यक्रम रद्द केले आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी १४४ कलम लागू केले आहे. यावरूनच या साथीची गांभीर्यता लक्षात येते. मात्र, सरकार दहावी, बारावीच्या परीक्षा स्थगित करत नसल्याचे दिसून येत आहे. या परीक्षा २३ मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत. परीक्षेच्या कामात लाखो शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षा मंडळ, असे मनुष्यबळ कार्यरत असते. केंद्रावर शेकडो विद्यार्थी एकत्र येऊन परीक्षा देतात. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने सर्वांच्याच जीवाला धोका आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन दहावी-बारावीच्या परीक्षा त्वरित स्थगित कराव्यात. विद्यार्थ्यांपासून परीक्षा मंडळापर्यंत प्रत्येक घटकांची जबाबदारी राज्य सरकार घेईल का?, असा सवालही परिषदेने केला आहे. परीक्षा त्वरित स्थगित कराव्यात, सर्व शाळांना सुटी घोषित करावी व त्याचे पालन करण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र