शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कल्याणमध्ये दुकानदारांकडून बंदी आदेशाचे उल्लंघन, एका दुकानदाराविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 02:40 IST

कपडा, सोने-चांदी, चप्पल विक्रे त्यांचा समावेश होता. सकाळी ११ वाजल्यानंतर संबंधित दुकाने उघडी असल्याचे चित्र कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाहायला मिळाले.

कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार केडीएमसीने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, आस्थापना वगळता अन्य दुकाने आणि आस्थापने शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून बंद राहतील, असे आदेश गुरुवारी काढले होते; परंतु या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी पाहायला मिळाले. यात जीवनावश्यक वस्तू नसणारी दुकानेही चालू राहिल्याने अखेर पोलिसांनी रस्त्यावर उतरून संबंधित दुकानदारांना समज दिली. बंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी एका दुकानचालकाविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव आणि प्रसार टाळण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार केडीएमसी हद्दीतील मॉल, नाट्यगृहे, चित्रपटगृह, शाळा आणि महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवली गेली आहेत. सरकारी कार्यालयांनीही गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची अंमलबजावणी सुरू केली आहे. या नंतरही गर्दी कायम राहिल्याने केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सरकारच्या सूचनेनुसार दुकाने बंद ठेवण्याचे आदेश गुरुवारी दिले होते. मात्र, या बंदीतून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत; परंतु आदेशाकडे दुर्लक्ष करीत काही दुकानदारांनी आपली दुकाने चालूच ठेवली.यात कपडा, सोने-चांदी, चप्पल विक्रे त्यांचा समावेश होता. सकाळी ११ वाजल्यानंतर संबंधित दुकाने उघडी असल्याचे चित्र कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाहायला मिळाले. त्यामुळे पोलिसांनी दुकानदारांना समज देत ती बंद करण्यास भाग पाडले. आदेशाचे उल्लंघन करणाºया दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी दक्ष नागरिकांनी केली आहे.राज्य सरकारच्या सूचनेनुसार आणि महापालिकेने जारी केलेल्या परित्रकानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकान वगळता इतर बहुतांश दुकाने शहरात बंद होती; परंतु रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ मात्र कमी झालेली नव्हती. दुपारी मात्र रस्त्यांवर शुक शुकाट दिसून आला.दरम्यान, बाजारपेठ पोलिसांची गस्त सुरू असताना बारदान गल्लीत शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता एक दुकानदार दुकान चालू ठेवून मालाची विक्री करताना आढळला. त्याच्याविरोधात पोलिसांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.रिक्षा बंदमुळे झाले हाल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक वाहतूक संदर्भात केलेल्या आवाहनानंतर कल्याणमधील रिक्षा शुक्रवारी दुपारी १:३० नंतर बंद करण्यात आल्या. मात्र, त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल झाले.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रमुख घटक म्हणून रिक्षाकडे बघितले जाते. दररोज अगणित प्रवाशांची वाहतूक रिक्षातून होत असते.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करीत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील रिक्षा शनिवारी आणि रविवारी स्वच्छेने बंद ठेवाव्यात, असे आवाहन रिक्षाचालकांना केल्याची माहिती कोकण रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी दिली. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याण