शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

पाणथळ जागेवर बांधकाम

By admin | Updated: February 16, 2016 02:22 IST

डोंबिवलीपासून जवळच असलेल्या कोपर व खंबाळपाडा, ठाकुर्ली, कल्याण समांतर रस्त्याला लागून असलेल्या पाणथळ जागेवर चाळी आणि बड्या

डोंबिवली : डोंबिवलीपासून जवळच असलेल्या कोपर व खंबाळपाडा, ठाकुर्ली, कल्याण समांतर रस्त्याला लागून असलेल्या पाणथळ जागेवर चाळी आणि बड्या इमारती उभ्या राहिल्याने या ठिकाणच्या पाणथळ जागा बिल्डर व चाळमाफियांनी गिळंकृत केल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या सगळ्या प्रकाराकडे कल्याण-डोंबिवली महापालिका, पर्यावरण खात्याचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे पाणथळ जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांचे फावले आहे. तसेच चाळीच्या चाळी उभारण्याचा सपाटाच चाळमाफियांनी लावला आहे. यापूर्वी कोपरला रेल्वे स्टेशन होते, ते अप्पर कोपर होते. दिवा-वसई रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी ही सुविधा होती. चाळमाफियांनी पाणथळ जागेवर अतिक्रमण केले. त्या ठिकाणी भराव टाकून बिल्डरांनी इमारती बांधल्या. चाळमाफियांनी चाळी बांधल्या. त्यातून कोपर रेल्वे स्थानकाची मागणी पुढे आली. आता कोपर रेल्वे स्टेशन आहे. स्टेशन झाल्यापासून या भागात पाणथळ जागेवरील बेकायदा बांधकामांना ऊतच आला आहे. तोच प्रकार कल्याण-ठाकुर्ली समांतर रस्त्यालगत दिसून येत आहे. खंबाळपाडा, ठाकुर्लीनजीक मोठ्या प्रमाणात पाणथळ जागा होती. त्या ठिकाणी खाडीला भरती आल्यावर पाणी त्या भागात शिरण्यास वाव होता. त्या ठिकाणी मोठी संकुले उभारली आहेत. पाणथळ जागी भराव टाकून इमारती उभारल्याने खंबाळपाडा परिसर पूर्ण इमारतींनी भरून गेला आहे. हा पूर्ण पट्टा मोकळा होता. कोपर ते दिवा ही मोकळी जागा बेकायदा चाळींनी जोडली जाणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला आदेश दिले आहेत की, सरकारने सर्व पाणथळ जागांचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी बांधकामे होऊ देऊ नयेत. होत असलेली बेकायदा बांधकामे थांबवावीत. सरकारने अद्याप तरी असा कोणताही अहवाल तयार केला नाही. तयार करण्याचे कामही हाती घेतलेले नाही. जागेचे भाव वाढल्याने जागेला किंमत आली आहे. त्यामुळे बिल्डरांकडून सर्रासपणे पाणथळ जागा भराव टाकून बुजवल्या जातात. त्या ठिकाणी बांधकामे केली जातात. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. त्या ठिकाणी महापालिका बांधकामाला परवानगी कशी देते? परवानगी देत नसेल तर बेकायदा बांधकामांवर कारवाई का करीत नाही, असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. एनव्हायरो वेल्फेअर सोसायटीचे अश्विन अघोर यांनी सांगितले की, पाणथळ जागा वाचवण्याविषयी सरकारची प्रचंड अनास्था आहे. त्याचबरोबर, स्थानिक स्वराज्य संस्था आणि वन खातेही त्याला तितकेच जबाबदार आहे. पाणथळ जागा वाचवल्या नाहीत तर भविष्यात एका दिवसाला ५०० मिलिमीटर पाऊस पडला तरी ज्या पाणथळ जागेवर बेकायदा बांधकामे उभी आहेत, ती पाण्याखाली जातील. ही भयावह परिस्थिती केवळ डोंबिवली परिसरात नाही, तर ठाणे-नाशिक हाय वे ला भिवंडी बायपास ते ठाण्यापर्यंतच्या पाणथळ जागेवरही तेच होत आहे. ईस्टर्न हाय वे लगत आणि उरणलाही हीच परिस्थिती आहे. याचा सर्वसमावेशक विचार होणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)