शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मलनि:सारण प्रक्रिया केंद्र बंद

By admin | Updated: October 8, 2015 00:16 IST

खडेगोळवली येथील महापालिकेच्या मलनि:सारण प्रक्रीया केंद्राचे काम भुयारी गटारी तुंबल्याने बंद पडले आहे. त्यामुळे शहरतील ६८ एमएलडी सांडपाणी थेट नाल्यात सोडले

- सदानंद नाईक,  उल्हासनगर

खडेगोळवली येथील महापालिकेच्या मलनि:सारण प्रक्रीया केंद्राचे काम भुयारी गटारी तुंबल्याने बंद पडले आहे. त्यामुळे शहरतील ६८ एमएलडी सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र हे केंद्र व भुयारी गटारीवर कोट्यवधीचा खर्च केल्याचे दाखविले जात आहे. शहरात महाराष्ट्र पाणीपुरवठा मलनि:सारण योजने अंतर्गत सन-१९८४ ते ९३ साला दरम्यान भुयारी गटारी योजना राबविली आहे. सन-१९९३ सालची ३ लाख ६० हजार लोकसंख्या गृहित धरून २८ द.ल.लीटर क्षमतेची योजना कार्यान्वीत केली. आजमितीस शहराची लोकसंख्या १० ते ११ लाख आहे. भुयारी गटारीची क्षमता संपल्याने जागोजागी ओव्हर फलो होऊन गटारी तुंबल्या आहेत. शहरात एकूण ६८ एमएलडी सांडपाणी निर्माण होत आहे. तर २८ क्षमतेचे खडेगोळवली येथील मलनिसा:रण केंद्र भुयारी जलवाहिन्या तुंबल्याने बंद पडले आहे. सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्यावत मलनिसा:रण केंद्र उभारण्याची मागणी सर्वस्तरातून होत असून आयुक्त मनोहर हिरे यांनी केंद्र बांधण्याला प्राध्यान्य देणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच बहुतांश इमारतीतील व घरातील शौचालयांना सेफटी टँक नसल्याने सांडपाणी उघडया नाल्यात सोडले जात असल्याचे पर्यावरण अहवालात म्हटले आहे. भुयारी गटाराची क्षमता संपली असून त्या तुंबल्याने पावसाळयात ओव्हर फलो होत आहे. बहुतेक इमारती व घरातील शौचालयांना सेफटी टँक नसलयाने ते सक्तीचे करणे गरजे झाले आहे. पालिका आरोग्य विभागाने सेफटी टँक नसणाऱ्या इमारती व घरांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्याचा मानस मुख्य स्वच्छता निरिक्षक विनोद केणे यांनी व्यक्त केला आहे. भुयारी गटारींची नवी योजना तातडीने राबविली नाहीतर आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे गटारी तुंबल्याचा अहवाल पालिकेकडे भुयारी गटारीची निगा राखण्यासाठी स्वत:चा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व अत्याधुनिक यंत्र सामुग्री नसल्याने कोटयावधीचा खर्च गटरी दुरस्तीवर केला जात आहे. खडेगोळवली मलनि:सारण केंद्र बंद असूनही त्यावर कोटयावधीचा खर्च पालिका करीत असल्याचे उघड झाले आहे. मलनिसा:रण केंद्र गटारी तुबंल्याने बंद असल्याची माहिती कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांनी दिली आहे. मग त्यावर खर्च कशासाठी होतो, असा प्रश्न निर्माण झाला असून त्याच्या चौकशीचे मागणी होत आहे.