शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नदी प्रदूषणाचा मागवला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 23:39 IST

उल्हास नदीच्या प्रदूषणास कारणीभूत असलेल्या खेमानी नाल्याची पाहणी जातीने करण्याचे आश्वासन विधीमंडळात देणाऱ्या पर्यावरणमंत्री कदम यांनी बुधवारी अचानक खेमानी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

उल्हासनगर : उल्हास नदीच्याप्रदूषणास कारणीभूत असलेल्या खेमानी नाल्याची पाहणी जातीने करण्याचे आश्वासन विधीमंडळात देणाऱ्या पर्यावरणमंत्री कदम यांनी बुधवारी अचानक खेमानी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. नदीच्याप्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या कंपन्यांची विस्तृत माहिती सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.उल्हास नदी प्रदुषित करणाºया खेमानी नाल्याचा प्रश्न वारंवार विधानसभेत अनेक आमदारांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नाल्याची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल देण्याचे आश्वासन सभागृहाला दिले होते. त्यानुसार कदम यांनी बुधवारी दुपारी अचानक खेमानी व उल्हास नदीची पाहणी केली. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने ३६ कोटीच्या निधीतून खेमानी नाल्याचा प्रवाह वळविण्याचे काम महापालिकेने सुरू केले होते. खेमानी नाल्याचे सांडपाणी अडवून विहिरीत आणले जाते. तेथून शांतीनगर येथे पाईपलाईनद्बारे नेवून मलनिस्सारण केंद्रात प्रक्रीया केली जाणार आहे. मात्र मलनिस्सारण केंद्राचे काम पूर्ण न झाल्याने खेमानी नाल्याचे सांडपाणी पम्पिंगद्वारे उल्हास नदी खाडीत सोडले जात आहे. गेल्या ३ वर्षांपासून खेमानी नाला योजनेचे काम संथगतीने सुरू असून, यासाठी ठेकेदारावर दंडात्मक कारवाईही केली आहे.महापालिका आयुक्तांसह स्थानिक शिवसेना पदाधिकाºयांनाही त्यांच्या दौºयाची पूर्वकल्पना नसल्याने, ते गैरहजर होते. त्यांच्यासोबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार, उल्हासनगर पालिकेचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन, बी. एस. पाटील यांच्यासह पालिका अधिकारी उपस्थित होते.अंबरनाथमधील प्रदूषित नाल्याचीही पाहणीअंबरनाथमधून वाहणाºया वालधुनी नदीला प्रदुषित करणाºया एमआयडीसी भागातील नाल्याचीही पाहणी रामदास कदम यांनी केली. ते कल्याण येथे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले असता, त्यांनी अंबरनाथ फॉरेस्ट नाका येथील एमआयडीसी भागातील नाल्याची पाहणी केली. या भागातील सर्व नाले थेट वालधुनी नदीला जोडले गेले असल्याने नदी प्रदुषित झाली आहे.गेल्या महिनाभरापासून अंबरनाथ शहरातील प्रदुषणाचा मुद्दा हा गाजत आहे. डम्पिंगमुळे आधीच पालिका प्रशासन त्रस्त असताना, आता वालधुनी नदीच्या प्रदुषणाचा मुद्दादेखील समोर आला आहे. एमआयडीसी भागातील सर्व सांडपाण्यावर एमआयडीसीमध्येच प्रक्रिया करण्याची अट असतानादेखील अनेक कारखानदार थेट नाल्यातच प्रदुषित पाणी सोडत आहेत.यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांकडे तक्रारदेखील करण्यात आली होती. यापार्श्वभूमिवर कदम यांनी अंबरनाथ शहरातील प्रदुषणाची माहिती घेतली. वालधुनीपाठोपाठ ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाºया उल्हास नदीच्या प्रदुषणाचीदेखील त्यांनी दखल घेतली. उल्हास नदीत सांडपाणी सोडले जात असल्याने नदीच्या संवर्धनाबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी पर्यावरण मंत्र्याकडे करण्यात आली होती.प्रशासनाची उडाली झोपवालधुनी आणि उल्हासनदीमधील प्रदुषणाच्या मुद्यावर कदम यांनी अचानक अंबरनाथ आणि उल्हासनगरचा दौरा आयोजित केला. त्यांच्या ऐनवेळच्या दौºयाने प्रशासनाची झोप उडाली. कदम येणार असल्याने पालिकेचा ताफा या ठिकाणी हजर होता. कदम यांनी आधी नाल्याची आणि नंतर डम्पिंगची पाहणी केली. डम्पिंगवर सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्याधिकारी देविदास पवार यांनी कदम यांना दिली. अंबरनाथचा दौरा आटोपून कदम लगेचच उल्हासनगमध्ये प्रदुषणाचा आढावा घेण्यासाठी रवाना झाले.वालधुनी नदीचा अहवाल मागितलाशहरातील जीन्स कारखाने बंद झाल्यावरही वालधुनी नदीचे प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढले आहे. वालधुनी नदीमध्ये कोणत्या नाल्यामुळे प्रदूषण होते, याची इत्थंभूत माहिती पुढील आठवड्यात देण्याचे आदेश पालिका आयुक्त अच्यूत हांगे यांनी महापालिकेचे कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांना दिले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरriverनदीpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषणRamdas Kadamरामदास कदम