शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

नदी प्रदूषणाचा मागवला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 23:39 IST

उल्हास नदीच्या प्रदूषणास कारणीभूत असलेल्या खेमानी नाल्याची पाहणी जातीने करण्याचे आश्वासन विधीमंडळात देणाऱ्या पर्यावरणमंत्री कदम यांनी बुधवारी अचानक खेमानी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

उल्हासनगर : उल्हास नदीच्याप्रदूषणास कारणीभूत असलेल्या खेमानी नाल्याची पाहणी जातीने करण्याचे आश्वासन विधीमंडळात देणाऱ्या पर्यावरणमंत्री कदम यांनी बुधवारी अचानक खेमानी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. नदीच्याप्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या कंपन्यांची विस्तृत माहिती सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.उल्हास नदी प्रदुषित करणाºया खेमानी नाल्याचा प्रश्न वारंवार विधानसभेत अनेक आमदारांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नाल्याची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल देण्याचे आश्वासन सभागृहाला दिले होते. त्यानुसार कदम यांनी बुधवारी दुपारी अचानक खेमानी व उल्हास नदीची पाहणी केली. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने ३६ कोटीच्या निधीतून खेमानी नाल्याचा प्रवाह वळविण्याचे काम महापालिकेने सुरू केले होते. खेमानी नाल्याचे सांडपाणी अडवून विहिरीत आणले जाते. तेथून शांतीनगर येथे पाईपलाईनद्बारे नेवून मलनिस्सारण केंद्रात प्रक्रीया केली जाणार आहे. मात्र मलनिस्सारण केंद्राचे काम पूर्ण न झाल्याने खेमानी नाल्याचे सांडपाणी पम्पिंगद्वारे उल्हास नदी खाडीत सोडले जात आहे. गेल्या ३ वर्षांपासून खेमानी नाला योजनेचे काम संथगतीने सुरू असून, यासाठी ठेकेदारावर दंडात्मक कारवाईही केली आहे.महापालिका आयुक्तांसह स्थानिक शिवसेना पदाधिकाºयांनाही त्यांच्या दौºयाची पूर्वकल्पना नसल्याने, ते गैरहजर होते. त्यांच्यासोबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार, उल्हासनगर पालिकेचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन, बी. एस. पाटील यांच्यासह पालिका अधिकारी उपस्थित होते.अंबरनाथमधील प्रदूषित नाल्याचीही पाहणीअंबरनाथमधून वाहणाºया वालधुनी नदीला प्रदुषित करणाºया एमआयडीसी भागातील नाल्याचीही पाहणी रामदास कदम यांनी केली. ते कल्याण येथे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले असता, त्यांनी अंबरनाथ फॉरेस्ट नाका येथील एमआयडीसी भागातील नाल्याची पाहणी केली. या भागातील सर्व नाले थेट वालधुनी नदीला जोडले गेले असल्याने नदी प्रदुषित झाली आहे.गेल्या महिनाभरापासून अंबरनाथ शहरातील प्रदुषणाचा मुद्दा हा गाजत आहे. डम्पिंगमुळे आधीच पालिका प्रशासन त्रस्त असताना, आता वालधुनी नदीच्या प्रदुषणाचा मुद्दादेखील समोर आला आहे. एमआयडीसी भागातील सर्व सांडपाण्यावर एमआयडीसीमध्येच प्रक्रिया करण्याची अट असतानादेखील अनेक कारखानदार थेट नाल्यातच प्रदुषित पाणी सोडत आहेत.यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांकडे तक्रारदेखील करण्यात आली होती. यापार्श्वभूमिवर कदम यांनी अंबरनाथ शहरातील प्रदुषणाची माहिती घेतली. वालधुनीपाठोपाठ ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाºया उल्हास नदीच्या प्रदुषणाचीदेखील त्यांनी दखल घेतली. उल्हास नदीत सांडपाणी सोडले जात असल्याने नदीच्या संवर्धनाबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी पर्यावरण मंत्र्याकडे करण्यात आली होती.प्रशासनाची उडाली झोपवालधुनी आणि उल्हासनदीमधील प्रदुषणाच्या मुद्यावर कदम यांनी अचानक अंबरनाथ आणि उल्हासनगरचा दौरा आयोजित केला. त्यांच्या ऐनवेळच्या दौºयाने प्रशासनाची झोप उडाली. कदम येणार असल्याने पालिकेचा ताफा या ठिकाणी हजर होता. कदम यांनी आधी नाल्याची आणि नंतर डम्पिंगची पाहणी केली. डम्पिंगवर सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्याधिकारी देविदास पवार यांनी कदम यांना दिली. अंबरनाथचा दौरा आटोपून कदम लगेचच उल्हासनगमध्ये प्रदुषणाचा आढावा घेण्यासाठी रवाना झाले.वालधुनी नदीचा अहवाल मागितलाशहरातील जीन्स कारखाने बंद झाल्यावरही वालधुनी नदीचे प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढले आहे. वालधुनी नदीमध्ये कोणत्या नाल्यामुळे प्रदूषण होते, याची इत्थंभूत माहिती पुढील आठवड्यात देण्याचे आदेश पालिका आयुक्त अच्यूत हांगे यांनी महापालिकेचे कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांना दिले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरriverनदीpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषणRamdas Kadamरामदास कदम