शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हजारेंच्या सहमतीनंतर धरणग्रस्तांचा बहिष्कार

By admin | Updated: September 23, 2014 00:10 IST

मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या काळू धरणामुळे सुमारे ४१ गावपाड्यांना जलसमाधी मिळणार आहे.

ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या काळू धरणामुळे सुमारे ४१ गावपाड्यांना जलसमाधी मिळणार आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी एकाही राजकीय पुढाऱ्याने अद्याप या गावकऱ्यांची बाजू मांडली नाही. यामुळे या विधानसभा निवडणुकीवरदेखील बहिष्कार टाकण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच ग्रामस्थांनी घेतल्याचे उघड झाले .मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर बांधण्यात येणाऱ्या या धरणाचे संपूर्ण पाणी मुंबई महानगरपालिकेला जाणार आहे. परंतु, मागील काही वर्षांपासून सुमारे ४१ गावपाड्यांनी तीव्र विरोध करून या धरणाचे काम थांबवले आहे. लोकसभा निवडणुकीवरदेखील सुमारे १८ हजार लोकसंख्येच्या १९ गावांमधील गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला होता. त्याची पुनरावृत्ती करून या विधानसभा निवडणुकीवरदेखील या गावकऱ्यांनी निर्धार कायम ठेवून बहिष्कार टाकला आहे. या निर्धारापूर्वी या गावांच्या शिष्टमंडळाने राळेगण सिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेऊन बहिष्कार टाकत असल्याचे त्यांना सांगितले आहे़अण्णांना भेटलेल्या शिष्टमंडळात काळू धरणविरोधी शेतकरी, कष्टकरी व भूमिहीन समुदाय मंचचे कृष्णकांत तेलम, पोपटराव देशमुख, भगवान भला, आत्माराम देशमुख, सदाशिव देशमुख, अशोक पठारे, सुरेश देशमुख, दशरथ देशमुख, प्रवीण देशमुख, रमेश राऊत आदी गावकऱ्यांचा समावेश होता.या वेळी त्यांनी काळू धरण बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना जबरदस्तीने धरणाचा घाट घातला जात आहे. याशिवाय, ४१ गावपाड्यांच्या सर्व ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन या धरणाला विरोध दर्शवला आहे. यानंतर, तळेगाव, जडई, फांगळोशी, खुटळ, चासोळे, दिघेफळ, शिवेचीवाडी, खरशेत, उंबरोली, कुंदाचीवाडी, लाहाडी, भिकारवाडी, शिरसोनवाडी, भट्टीची वाडी, पायरवाडी, वाकळवाडी, न्याहाडी आदी गावांच्या गावकऱ्यांनी तळेगाव येथे एकत्र येऊन बैठक घेतली आणि मतदानावर बहिष्कार टाकला.