शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

भिवंडीच्या नाट्यमय राजकारणात ‘कोणार्क’ ठरली बाजीगर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 12:23 AM

वंडी महापालिकेत अडीच वर्षे विरोधी बाकांवर बसलेली कोणार्क विकास आघाडी सत्ताधारी झाली.

- नितीन पंडित

वंडी महापालिकेत अडीच वर्षे विरोधी बाकांवर बसलेली कोणार्क विकास आघाडी सत्ताधारी झाली. काँग्रेसचे तब्बल १८ नगरसेवक फुटल्याने मोठ्या प्रमाणावर सौदेबाजी झाल्याचे उघडच आहे. नगरसेवकांच्या या सौदेबाजीमुळे भिवंडीचे राजकारण चांगलेच तापले आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या नेतेमंडळींच्या ही हार मात्र चांगलीच जिव्हारी लागली आहे. एकहाती सत्ता असताना १८ नगरसेवक का फुटले? याचे चिंतन करण्याची वेळ काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर आली आहे. नुसते महापौरपदच गमावले नसून काँग्रेसचे वर्चस्व आणि अस्तित्वही पणाला लागले आहे.

भिवंडी महापालिकेत ९० नगरसेवक आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे ४७, शिवसेना १२, भाजप २०, कोणार्कविकास आघाडी ४, समाजवादी पार्टी २, आरपीआय (एकतावादी) ४, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता होती. काँग्रेसचे नगरसेवक फुटण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता २०१७ मध्ये शिवसेनेच्या १२ नगरसेवकांना सोबत घेऊन उपमहापौरपद शिवसेनेला दिले होते. तेव्हा काँग्रेसचे जावेद दळवी हे महापौर, तर शिवसेनेचे मनोज काटेकर हे उपमहापौर झाले होते. काँग्रेसची शहरावर एकहाती सत्ता असतानाही शहराची वाताहत झाली आहे. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांवर जनतेचा रोष वाढला होता. त्यातच काँग्रेस पक्षश्रेष्ठींची महापालिकेत एकहाती हुकूमत होती. काँग्रेसचे अनेक नगरसेवक कर्जबाजारी असल्याने हीच संधी साधत कोणार्कच्या नेत्यांनी लाखो रुपयांची प्रलोभने दाखवून त्यांना आपल्याकडे खेचले. हा आकडा ३० लाखांच्या घरात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

दरम्यान, काँग्रेसचे गटनेते हलीम अन्सारी यांनी दोन व्हिप काढले. एका व्हिपद्वारे त्यांनी काँग्रेसच्या नगरसेविका रिषिका राका तर दुसऱ्या व्हिपमध्ये कोणार्कच्या प्रतिभा पाटील यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. हे व्हिप काही दैनिकांमध्ये मतदानाच्या दिवशीच प्रसिद्ध केले होते. या व्हिपच्या आधारेच आपण कोणार्कच्या प्रतिभा पाटील यांना मतदान केले असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसच्या १८ बंडखोर नगरसेवकांनी दिले आहे. तर दुसरीकडे आपण कोणार्कच्या बाजूने मतदान करण्याचा कोणताही व्हिप प्रसिद्ध केला नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे. एकंदरीतच आरोप-प्रत्यारोप होत असले तरी भिवंडी महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कोट्यवधींचा सौदा झाला हे उघड आहे.

भिवंडीचा राजकीय इतिहास पहिला तर मुस्लिमबहुल मतदार जास्त असल्याने येथे काँग्रेसचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदरात नुसते महापौरपद नाही तर आमदार, खासदार ही पदेही पडली आहेत. निवडून आलेला काँग्रेस नेता सत्ता आपली जहागिरी असल्याप्रमाणे वागत असल्याने ती टिकवणे वेळोवेळी कठीण झालेले आहे. तसेच जनकल्याणाऐवजी स्वत:च्या आर्थिक सुबत्तेकडेच लक्ष देत असल्याने त्याचा फटका पक्षाला स्थानिक पातळीवर बसत आहे. मुस्लिम मते ही काँग्रेसची हक्काची आहेत, ही वृत्ती मारक ठरत असून मतदार आता हुशार झाले आहेत आणि ही बदलती परिस्थिती काँग्रेसचे नेते मानायला तयार नाहीत. त्यामुळेच खासदार, आमदार या पदांबरोबरच आता महापौरपदही काँग्रेसला गमवावे लागले आहे.

अहंकार आणि सौदेबाजी यामुळे काँग्रेस रसातळाला गेली असून विधानसभा निवडणुकीत पूर्वेत समाजवादी पक्ष आणि पश्चिमेत एमआयएमने डोके वर काढले आहे. याचा फटका भविष्यात काँग्रेसला निश्चितच बसणार आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघ सध्या समाजवादीच्या ताब्यात आहे, तर पश्चिम मतदारसंघ भाजपकडे आहे. महापालिकेत एकहाती सत्ता असलेली काँग्रेस विधानसभा निवडणुकीत तिसºया क्रमांकावर फेकली जाते, यातच सर्वकाही आले. पश्चिममध्ये एमआयएमचा शेवटच्या क्षणाला निसटता पराभव झाला होता. याची जाण काँग्रेस पक्षश्रेष्ठींना असती तर आर्थिक घोडेबाजाराला काँग्रेसला लगाम घालता आला असता. नगरसेवक फुटणे ही पक्षासाठी भविष्यातील धोक्याची घंटाच असून पक्षनेतृत्वाने ती वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीShiv Senaशिवसेना