शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

‘बारवी’बाधित काळे - वडखळच्या ग्रामस्थांची न्यायालयाकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 01:27 IST

एका आठवड्यात म्हणणे मांडा । एमआयडीसीला आदेश

सुरेश लोखंडे

ठाणे : बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अडकलेल्या मुरबाड तालुक्यातील काळे वडखळ, तळ्याचीवाडी येथील गांवकऱ्यांचे पुनर्वसन या वर्षीही झाले नाही. त्यामुळे जलसमाधी मिळण्याच्या भीतीने या गांवकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अखेर धाव घेतली आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी होऊन एमआयडीसीला एक आठवड्यात म्हणणे मांडण्याची तंबी न्यायालयाने दिली असल्याची माहिती श्रमिक मुक्तीच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी दिली.

'बारवीच्या जलसमाधीतून वाचवण्यासाठी काळे वडखळच्या ग्रामस्थांचा टाहो ! ' या मथळ्याखाली लोकमतने २५ मे रोजी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते जिल्ह्यातील महापालिका,नगरपालिका आणि औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना पाणीपुरवठा करणाºया या धरणाच्या पाणलोटात ही तीन गांवपाडे आहे. या धरणाची उंची वाढवल्यामुळे गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात त्यांच्या चोहोबाजूने पाणी होते. त्यावेळी येथील ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन राहिले. रस्तेही पाण्याखाली गेल्याने या ग्रामस्थांना पाण्याबाहेर येणेही शक्य नव्हते. त्यानंतर यंदाच्या पावसाळ्यापूर्वी अन्यत्र पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी वर्षेभर पाठपुरावा करूनही एमआयडीसीने केवळ आश्वासने दिली. मात्र, अजूनही ते केले नाही. या मनमानीविरोधात गांवकºयांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून तीवर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीत म्हणणे मांडण्यासाठी एमआयडीसीने दोन आठवड्याची मुदत देण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने एक आठवड्याची मुदत देऊन येत्या शुक्रवारी सुनावणीला हजर होण्याचे आदेश दिले, असे तुळपुळे यांनी निदर्शनात आणून दिले.येत्या शुक्रवारी पुन्हा सुणावणीएमआयडीसीच्या मालकीच्या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात ही बाधीत गांवखेडी कित्येक वर्षांपासून पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहतात. आता धरणाची उंची वाढल्यामुळे गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात धरणात साठा वाढून या गांवपाड्यांमध्ये पाणी शिरले होते. यावर मात करण्यासाठी पुनर्वसन करणे अपेक्षित होते. मात्र, एमआयडीसीने ते गांभीर्याने घेतले नाही. त्याविरोधात आता न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून त्या शुक्रवारी त्यावर पुन्हा सुनावणी आहे.पाच खेड्यांचे गेल्या वर्षी केले पुनर्वसनग्रामस्थांचे पुनर्वसन न झाल्यामुळे त्यांच्यावर जलसमाधीची टांगती तलवार आहे. बारवी धरणाच्या या पाणलोटक्षेत्रात सात गांवखेड्यांचा समावेश होता. यापैकी पाच गांवखेड्यांचे गेल्या वर्षी पुनर्वसन झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय